आषाढी एकादशी हा महाराष्ट्राचा सर्वात मोठा वारकरी सण आहे. वारकरी परंपरा भक्ती आणि एकात्मतेचे संस्कार विद्यार्थिनींमध्ये रुजावेत यासाठी म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेत दि. २४ जुलै २०२६ रोजी पालखी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला.
शाळेच्या सभागृहात ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ च्या गजरात इ. सहावीच्या विद्यार्थिनींनी पालखी आणली. सहावीच्या विद्यार्थ्यांनी स्वतः ही पालखी बनवली व सजवली होती. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ ज्योती खिरीड, सीनियर मास्टर श्री अद्वैत जगधने यांनी पालखीचे पूजन व आरती केली. प्रशालेचे शिक्षक श्री प्रभात गुंड यांनी आषाढी एकादशी व वारीचे महत्त्व सर्व विद्यार्थिनींना सांगितले. सहावीच्या विद्यार्थिनींनी संतांची वेशभूषा व त्याचे सादरीकरण केले. पालखी सोहळ्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व वसतिगृह विभाग सर्व सदस्य उपस्थित होते. पालखी सोहळ्यानंतर कुलशः अभंग गायन स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.





















पालखी फोटो बघण्यासाठी 👇 लिंक…
https://drive.google.com/drive/folders/1_ejbWCz8Uz1Uz1ctI-HQgIfZk9yqpl79?usp=drive_link
