स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना ‘हर घर झेंडा’ या उपक्रमात प्रशालेचा सहभाग…… प्रभातफेरी…..

गुरुवार, दिनांक ११ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा, कासार आंबोली ता. मुळशी, जि. पुणे,
संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना ‘हर घर झेंडा’ या उपक्रमांतर्गत कासार आंबोली गावामध्ये ग्रामपंचायतचे सर्व सदस्य सरपंच उपसरपंच यांसमवेत प्रभात फेरी काढून जनजागृतीपर पत्रके वाटून आणि घोषणा देत प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थिनींच्या घोष पथकाने लोकांना जागृत करण्यासाठी वातावरण निर्मिती केली आणि विद्यार्थिनिंनी घोषणा देत परिसर दणाणून सोडला…
हातात घेतलेले फलक लोकं उत्साहाने वाचत होते आणि उपक्रमाविषयी माहिती घेत होते.
प्रभात फेरीची सुरुवात प्रशालेच्या परिसरातून सुरू होऊन ग्रामपंचायत कासार आंबोली गावाच्या प्रांगणात सांगता झाली.
सदर कार्यक्रमास गावाचे सरपंच कुमार रणजित गायकवाड, उपसरपंच स्वप्नील कांबळे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, उपस्थित होते.
तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुवर्णा कांबळे, उपमुख्याध्यापक अनंत कुलकर्णी प्रशालेचे जेष्ठ शिक्षक अद्वैत जगधने, सुनीता शिंदे, भाऊसाहेब मार्तंड, रविराज थोरात, महादेव मगर तसेच प्रशालेतील हॉस्टेल विभागाच्या प्रियंका गुरव, शितल मार्तंड आणि प्रशालेचे सेवक पोपट कणगरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Scroll to Top
Skip to content