आपल्या प्रशालेतील इ.७ वी ब ची विद्यार्थिनी कु.गीता गणपत धनवडे हिने ATL Tinkering Marathon मध्ये सादर केलेल्या प्रकल्पाची निवड राष्ट्रीयस्तरावर सहभागी 7000 प्रकल्पांपैकी महाराष्ट्रातील Top 10 प्रकल्पात  करण्यात आली आहे. गीताचे प्रशालेतर्फे खूप खूप अभिनंदन !👍🏻👍🏻💐

विद्यार्थिनीचे नाव : कुमारी गीता गणपत धनवडे, इयत्ता :- सातवी (ब)

Project Name :-  Police Whistle with Safety Enclosure protection from COVID – 19 virus.

प्रोजेक्ट नंबर – 1 ची माहिती खालील प्रमाणे आहे :

कोरोना महामारीमध्ये कोरोना फ्रन्टलाइन वॉरियर्स पोलिसांचा मृत्यू झाला. यामध्ये मुख्य कारण पोलिसांची शिट्टी असू शकते. म्हणून कुमारी गीता गणपत धनवडे हिने या गोष्टीचा अभ्यास करून एक प्रोजेक्ट बनविला. पोलिसांच्या शिट्टीला क्लोजर (स्टील मटेरियलचे संरक्षक कवच /कव्हर)  बसविले आणि संपूर्ण संरक्षण दिले.

यामुळे पोलिसांचा हात शिट्टीच्या थेट संपर्कात येत नाही. तसेच वातावरणातील धुळ आणि इतर विषाणू हे शिट्टीच्या संपर्कात येत नाहीत.

या प्रोजेक्टचा फायदा पोलीस दलातील अधिकारी, शारीरिक शिक्षक शिकविणारे शिक्षक, क्रीडा शिक्षक, सैन्य अधिकारी, ज्यांच्याकडून शेट्टीचा वापर होतो, या सर्वांचे कोरोना पासून संरक्षण करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.

मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या संकल्पनेत या प्रोजेक्टचा वापर होईल.

     

 

 

 

प्रोजेक्ट नंबर – 2 ची माहिती खालील प्रमाणे आहे :

Project Name :-  Eco friendly, Natural Gaint Wheel, Balanced on Single Point for Divyang or Ordinary Students, which will be reduce Carbon Footprint.

प्लास्टिक कचऱ्याचा भस्मासुर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे, त्यामुळे मानवी आरोग्य धोक्यात आले आहे.

प्लास्टिक कचरा वाढण्याचे अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे प्लास्टिक पासून बनवलेली खेळणी, जी सर्वात जास्त चीन या देशातून आयात केली जातात.

प्लास्टिक पासून बनवलेल्या खेळण्यापासून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी, नैसर्गिक संसाधनाचा वापर करून दिव्यांग मुलासाठी खेळणे बनवणे आवश्यक आहे. म्हणून कुमारी गीता गणपत धनवडे हिने या गोष्टीचा अभ्यास करून एक प्रोजेक्ट बनविला.

यामध्ये तिने बाभळीच्या काट्यांचा उपयोग चांगल्या पद्धतीने केला. काटे मुलांना टोचू नयेत म्हणून, काट्याच्या प्रत्येक टोकाला शेळीच्या सुकलेल्या लेंड्यांचा उपयोग केला. ज्यामुळे काट्यांचे टोक सुरक्षित झाले. एकूण बत्तीस काटे आणि 64 शेळीच्या लेंड्या यांचा वापर करण्यात आला. सेंटरला एक लाकडी दांडी उभा केली. खाली बेसला पिठाचे बेस करण्यात आला. या सेंटरच्या काठी वरती एक काटा लावण्यात आला आणि त्यावरती सर्व सांगाडा बसवण्यात आला.

आणखी एक काठी घेऊन, या काठीच्या साह्याने हा संपूर्ण सांगाडा एका पॉईंट वरती फिरविला जातो. त्यावेळेस मुलांना हा प्रोजेक्ट करत असताना वेगळा आनंद मिळतो.

यामध्ये प्लास्टिकचा बिलकुल वापर केलेला नाही. सदरील प्रोजेक्ट हा संपूर्णतः निसर्गातून मिळणाऱ्या वस्तूंनी बनविलेला आहे. त्यामुळे कार्बन फूटप्रिंट खूप कमी प्रमाणात तयार होतात. वातावरण प्रदूषित होत नाही आणि स्वच्छ वातावरण तयार करण्यास मदत होते.

या प्रोजेक्टमुळे दिव्यांग मुलांना दोन्ही हाताचा वापर करून, डावा आणि उजवा मेंदू विकसित करण्यात मदत होते.

मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या संकल्पनेत या प्रोजेक्टचा वापर होईल.

                     

Ex- Principal – M. E. S. Rani Laxmibai Mulinchi Sainiki Shala and Jr. College, Kasar amboli, Tal- Mulshi, Dist- Pune

Giving her Wishes to RLMSS…

https://youtu.be/rnGY42bmzNY    –  Sau. Shraddha Sanjay Walimbe, Ex- Principal, RLMSS.

 

Ex- Students- M. E. S. Rani Laxmibai Mulinchi Sainiki Shala and Jr. College, Kasar amboli, Tal- Mulshi, Dist- Pune

Giving their Wishes to RLMSS…

https://youtu.be/wzO8eYTZZ5g    Cadet  Maitreyee Dandekar

https://youtu.be/b3m3V8QqleE  Cadet Yashashree Birje

https://youtu.be/zj6vkPYpESU     Cadet  Apurva Kulkarni

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेसारखी अतिशय दर्जेदार शाळा चालवत आहे ही कौतुकास्पद बाब आहे. भारतीय सैन्यदले आणि अन्य केंद्रीय दलांमध्ये सेवा बजावता यावी यासाठी लहान वयातील विद्यार्थिनींना अतिशय पोषक वातावरणात उपलब्ध करून देत जबाबदार, शिस्तबद्ध आणि कर्तव्यनिष्ठ महिला अधिकारी घडवण्याचे काम संस्था करत आहे. या शाळेत शिक्षण घेतलेल्या अनेक विद्यार्थिनी आज देशाच्या सैन्यदलात सेवा बजावत आहेत ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये देखील अशाच पद्धतीने शाळेच्या माजी विद्यार्थिनी लक्षणीय कामगिरी बजावत आहेत, हे शाळेसाठी खरोखरच अभिमानास्पद आहे,” अशा शब्दात देशाचे लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी शाळेच्या कामगिरीचे कौतुक केले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या उद्घाटनानिमित्त आयोजित समारंभात शाळेच्या आवारातील राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्याचे आभासी पद्धतीने अनावरण जनरल मनोज नरवणे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

डेप्युटी चीफ ऑफ इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ (मेडिकल) लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर आणि पुण्यातल्या NCC ग्रुपचे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर सुनील लिमये यांच्या उपस्थितीत झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) हे होते.

या वेळी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे आणि मा. प्रदीप नाईक, संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, उपाध्यक्ष सीए अभय क्षीरसागर, शाला समितीच्या अध्यक्ष डॉ. माधवी मेहेंदळे, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे, शाळेच्या महामात्र डॉ. मानसी भाटे आणि चित्रा नगरकर तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. सुलभा विधाते हे उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर म्हणाल्या की, मुलींसाठी सैनिकी शाळा चालवत असल्याबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे आभार मानायला हवेत. संस्थेने अतिशय सुंदर शाळा उभी केली आहे. यापूर्वीदेखील या शाळेच्या कार्यक्रमात मला सहभागी होता आले होते. शाळेला असलेले राणी लक्ष्मीबाई यांचे नावच प्रेरणादायी आहे. सैनिकांचा गणवेश आणि त्यांची शिस्त बघूनच मी वैद्यकीय पदवी प्राप्त केल्यानंतर लष्करी सेवेत जाण्याचा निर्णय घेतला. सैनिकी शाळेतील विद्यार्थिनींनी आपण एक मुलगी आहोत असा विचार न करता आपल्यातील स्त्री शक्ती जाणून घेण्याची आवश्यकता आहे. महिलांमध्ये कणखरपणा आणि एकाच वेळेला अनेक आघाड्यांवर काम करण्याची क्षमता असते. त्यामुळे विद्यार्थिनींनी आपल्याला एखादी गोष्ट जमेल का? असा विचार करण्याची गरज नाही. कठीण परिस्थितीवर आपल्या अनुभवाच्या आधारे मात करायला शिकता आले पाहिजे. प्रश्न निर्माण होतील तेव्हा खचून न जाता शाळेने दिलेले संस्कार आठवा आणि अडचणींचे संधी रुपांतर करा.”

राष्ट्रीय छात्र सेना म्हणजेच NCC च्या वायूदलाचे युनिट शाळेत नव्याने सुरू झाले आहे. पुण्यातल्या NCC ग्रुपचे कमांडर ब्रिगेडियर सुनील लिमये यांच्या हस्ते यावेळी शाळेला NCC चा ध्वज प्रदान करण्यात आला. संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे यांनी तो स्वीकारला. ३ महाराष्ट्र एअर स्क्वाड्रनचे कमांडिंग ऑफिसर ग्रुप कॅप्टन आर.एस. जाधव यावेळी उपस्थित होते.

संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे यांनी आपल्या प्रास्ताविकात शाळेच्या स्थापनेमागील महिला सक्षमीकरणाची भूमिका विशद केली.
डॉ. माधवी मेहेंदळे यांनी आभार प्रदर्शन तर अपूर्वा बर्वे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. मएसो ऑटोरीअममध्ये आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण संस्थेच्या फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनलद्वारे करण्यात आले होते.

             

                     

म. ए.सो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा व उच्च माध्यमिक विद्यालय ,कासार आंबोली ता.मुळशी व स्वच्छ विचार फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सैनिकी शाळेत 21 जून जागतिक योगदिनानिमित्त दि.22 ते 30 जून आँनलाईन योग सप्ताह उत्साहात पार पडला.योग प्रशिक्षक सौ.अनुराधा गणपत धनवडे यांनी रोज विविध योगासने ,प्राणायाम व सूर्यनमस्कार यांची शास्त्रशुध्द माहिती सांगून प्रात्यक्षिकांचा सराव करून घेतला . सर्व विद्यार्थिनी ,शिक्षक व पालकांनी यात उत्स्फूर्त सहभाग घेतला या कार्यक्रमाचे संयोजन मा.प्राचार्या डॉ. सुलभा विधाते यांच्या मार्गदर्शनानुसार क्रीडाविभाग प्रमुख श्री.संदीप पवार ,क्रीडाशिक्षक श्री.राजू दाभाडे ,सैन्य प्रशिक्षक श्री.चंद्रकांत बनसोडे, श्री.गजानन माळी ,श्री.निलेश वाघमळे यांनी केले होते.

         

 

 

21 जून आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त म.ए.सो क्रीडावर्धिनी च्या वतीने आँनलाईन योगासनांचा कार्यक्रम झाला यात योगाचे महत्त्व या विषयावर योग प्रशिक्षक श्री.अभय माटे (अध्यक्ष जनता सहकारी बँक ) यांनी मार्गदर्शन केले,या निमित्ताने सैनिकी शाळेतील ,विदयार्थिनीं,शिक्षक व पालक यांनी ही उत्स्फूर्त सहभाग घेतला .

पुणे, दि. ८ जुलै : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची आणखी एक स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाने दि. ७ जुलै २०२१ रोजी २५ व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यानिमित्ताने शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे उद्घाटन आणि शाळेच्या आवारातील राणी लक्ष्मीबाई यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आभासी पद्धतीने अनावरण करण्याचा कार्यक्रम मंगळवार, दि. १३ जुलै २०२१ रोजी सकाळी १०.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

मयूर कॉलनीमधील मएसो ऑडिटोरीअम येथे होणाऱ्या या कार्यक्रमाला भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे PVSM, AVSM, SM, VSM, ADC हे आभासी पद्धतीने उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे उद्धाटन व राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर AVSM, VSM (Deputy Chief of Integrated Defence Staff (Medical)) व ब्रिगेडियर सुनील लिमये VSM (Group Commander, NCC Group, Pune) हे या समारंभाला प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत.  महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ संपन्न होणार आहे. या समारंभाचे प्रक्षेपण फेसबुक आणि ‘मएसो’च्या युट्यूब चॅनेलद्वारे करण्यात येणार आहे.

त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून आभासी पद्धतीने या समारंभात सहभागी होता येणार आहे …

https://www.youtube.com/watch?v=2taN2FqpvEM

https://www.facebook.com/100973985597451/posts/101884895506360/

ब्रिगेडियर सुनील लिमये VSM (Group Commander, NCC Group, Pune) यांच्या हस्ते राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाला राष्ट्रीय कॅडेट कोर म्हणजेच NCC चा ध्वज प्रदान करण्याचा कार्यक्रमदेखील यावेळी होणार आह.

छायाचित्रात (डावीकडून) शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. सुलभा विधाते, सैनिकी शाळेच्या शाला समिती अध्यक्ष डॉ. माधवी मेहेंदळे, ‘मएसो’च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे, ‘मएसो’ चे सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे आणि शाला समितीचे सदस्य बाबासाहेब शिंदे.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने या समारंभाची माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे आणि सैनिकी शाळेच्या शाला समितीच्या अध्यक्ष डॉ. माधवी मेहेंदळे यांनी ही माहिती दिली. या वेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे, शाला समितीचे सदस्य बाबासाहेब शिंदे आणि शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. सुलभा विधाते उपस्थित होते.

“सभ्य आणि समर्थ समाजनिर्मितीसाठी महिलांचे सक्षमीकरण अतिशय महत्वाचे ठरते, म्हणूनच महिलांचे शिक्षण व सक्षमीकरणासाठी ‘मएसो’ सुरवातीपासूनच प्रयत्नशील आहे. आजमितीस सुमारे २० हजार विद्यार्थिनी संस्थेच्या विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत आहेत. महिला सक्षमीकरणाच्या हेतूने सुरू करण्यात आलेल्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनी आज देशाच्या सशस्त्र सेनादलांमध्ये आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत. याशिवाय अनेक विद्यार्थिनींनी जीवनाच्या विविध क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली आहे,” अशी माहिती आर्किटेक्ट राजीव सहस्रबुद्धे यांनी या वेळी दिली.

“शाळेतील स्वावलंबी जीवनशैली, नियमितपणा, शिस्त, संस्कार, विविध उपक्रमांमुळी विस्तारणारा दृष्टिकोन या सर्वांचा अतिशय सकारात्मक परिणाम विद्यार्थिनींवर होतो. त्यामुळे त्यांच्यात अन्य शाळांमधील विद्यार्थिनींच्या तुलनेत प्रचंड आत्मविश्वास निर्माण होतो. शाळेत मिळालेल्या शिक्षण, संस्कार आणि प्रशिक्षणाच्या जोरावर आमच्या सैनिकी शाळेत शिकलेल्या विद्यार्थिनींनी सशस्त्र सेनादलांमध्ये महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. अन्य क्षेत्रात गेलेल्या विद्यार्थिनी आपापल्या क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावत आहेत ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे,” असे डॉ. मेहेंदळे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

“शाळेतील शिक्षण व प्रशिक्षणामुळे विद्यार्थिनींची बौद्धिक, मानसिक आणि शारिरीक जडणघडण अतिशय उत्तमरितीने होते. त्यामुळेच त्या सशस्त्र सैन्यदलांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी आवश्यक असलेल्या परिक्षांप्रमाणे अन्य स्पर्धा परिक्षांमध्ये चांगले यश मिळवू शकतात. शाळेतील विद्यार्थिनींना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच एनडीएमधील प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण मिळाले तर त्यांची कामगिरी अधिक चांगली होईल,” असे शाळेच्या शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. सुलभा विधाते यांनी सांगितले.

आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, श्री. वामन प्रभाकर भावे आणि श्री. लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांनी राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उद्देशाने इ. स. १८६० मध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापन केली. गेल्या १६० वर्षात संस्थेने शिशु शाळेपासून उच्च शिक्षणापर्यंत व त्यापुढे जाऊन संशोधनापर्यंत आणि व्यवसायाभिमुख प्रशिक्षणापासून कौशल्यविकास अभ्यासक्रमांपर्यंत आपले शैक्षणिक क्षेत्र विस्तारले आहे. आजमितीस ७ जिल्ह्यात असलेल्या संस्थेच्या ७० शाखांमधून सुमारे ५० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. क्रमिक शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्यातील अनेक उपक्रम हे समाजातील विविध घटकांच्या गरजा आणि काळानुरूप निर्माण झालेल्या गरजा लक्षात घेऊन सुरू करण्यात आले आहेत.

 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशात दहशत निर्माण केली आहे. या संक्रमणापासून बचाव करण्यासाठी योगा, प्राणायाम, मेडिटेशन अतिशय लाभदायक आहेत.
म्हणूनच प्रशालेने इ. 6 वी ते 12 वी सर्व विद्यार्थिनी, पालक व शिक्षक यांच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने दिनांक 27 एप्रिल ते 29 एप्रिल संध्याकाळी सात ते आठ या वेळेत प्रशिक्षण आयोजित केले.
‘आर्ट ऑफ लिविंग’ च्या माध्यमातून, आपल्या पालकांपैकीच इ. 11 वी चे पालक श्री. दिपक चव्हाण यांच्या सहकार्यातून प्रशालेने हे
प्रशिक्षण आयोजित केले.
‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ चे प्रशिक्षक श्रीमती वंदना जैन, श्री. करुणानिधी, श्रीमती अबोली हळवे, श्रीमती अनुप्रभा प्रशांथ, यांनी योगासने, भस्त्रिका, भ्रामरी सारखे प्राणायाम, विविध खेळांच्या माध्यमातून स्मरणशक्ती वाढविण्यासाठीचे व्यायाम सांगितले. हसतखेळत दिलेल्या प्रशिक्षणाला तिनही दिवस विद्यार्थिनी भरभरून प्रतिसाद दिला.
या प्रशिक्षणाला प्रशालेच्या प्राचार्या डॉ. सुलभा विधाते, उपप्राचार्य श्री. अनंत कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रशालेचे पदाधिकारी व सर्व स्टाफ या प्रसंगी उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन सौ. सावित्री पाटील आणि श्री. प्रमोद झुरमुरे यांनी केले.

   

   

   

   

प्रतिवर्षीप्रमाणे दि. २८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी – अटल समिती, शिक्षण प्रबोधिनी व राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने Science February हा उपक्रम संपूर्ण महिन्यात राबविण्यात आला.त्याअंतर्गत विज्ञान पाठ्यपुस्तकातील विविध संकल्पनांवर आधारित Hands on activities यावर आधारित अध्यापक कार्यशाळा व्याख्यानमालेचे आयोजन सर्व शाळांतील विज्ञान शिक्षकांसाठी करण्यात आले. या कार्यशाळा दि. ७, १४, २१ फेब्रुवारी रोजी ऑनलाईन संपन्न झाल्या. दि. ७ रोजी अगस्त्य फाउंडेशन, दि. १४ रोजी आयुका व कार्यक्रम रोजी आयसर पुणेच्या तज्ञांनी मार्गदर्शन केले.
या सर्व कार्यशाळांचे नियोजन आपल्या प्रशालेतर्फे विज्ञान विभाग प्रमुख सौ मंजिरी पाटील यांनी प्राचार्या मा. डॉ. सुलभा विधाते व उपप्राचार्य मा. श्री. अनंत कुलकर्णी व शालेय पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार केले. इ. ६ वी ते १२ वी च्या सर्व विज्ञान अध्यापकांनी उपक्रम यशस्वी रित्या राबविण्यात सक्रिय सहभाग नोंदवला.
दि. २८ रोजी या उपक्रमाचा समारोप कार्यक्रम संपन्न झाला. विज्ञान भारतीचे राष्ट्रीय संघटन मंत्री मा. श्री. जयंत सहस्रबुद्धे यांनी Future of Science & technology in Education या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म. ए. सो. नियामक मंडळ उपाध्यक्ष मा.श्री.अभयजी क्षीरसागर, सहसचिव गाडे सर, शिक्षण प्रबोधिनी अध्यक्षा मा. आनंदी पाटील, संचालक मा. श्री. संतोष देशपांडे उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप प्रा. डॉ. सुलभा विधाते यांनी केला.
संपूर्ण उपक्रम नियोजन, तांत्रिक सहकार्य यासाठी शिक्षण प्रबोधिनी उपसंचालक मा. श्री. केदार तापीकर व वर्षा न्यायाधीश madam यांचे विशेष सहकार्य लाभले.
या उपक्रमाचा भाग म्हणून प्रशालेमध्ये विविध उपक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
इ.६ वी – विज्ञान कोडे स्पर्धा
इ.७ वी – भारतीय शास्त्रज्ञ माहिती संकलन
इ.८ वी – विज्ञान कोपरा – तक्ते, चित्रे, मॉडेल, कात्रणे इ.
इ.९ वी – आयुका पुणे आयोजित, कविता व पोस्टर स्पर्धा सहभाग, प्रश्नमंजूषा स्पर्धा
इ.११ वी – विज्ञान दिन परिपाठ कार्यक्रम नियोजन व सहभाग – १ मार्च रोजी
तसेच जून ते फेब्रुवारी ऑनलाईन कार्यशाळा, विज्ञान प्रदर्शन, स्पर्धा , व्याख्याने यासारख्या २६ विविध उपक्रमात आपल्या प्रशालेच्या विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला आहे.

शनिवार, दिनांक :  २७ फेब्रुवारी २०२१ रोजी म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा या ठिकाणी “रोटरी क्लब पुणे मेट्रोच्या” वतीने स्मार्ट बोर्डचे हस्तांतरण करण्यात आले. रोटरी मेट्रो क्लब पुणे यांनी शाळेला दोन आधुनिक स्वरूपाचे स्मार्ट बोर्ड दिले. ज्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे ज्ञानदानाचे कार्य अधिक आधुनिक, सुसंगत व तंत्र स्नेही होईल अशी आशा आहे. या कार्यक्रमासाठी पुणे मेट्रो चे अध्यक्ष श्री. मकरंद फडके तसेच समन्वयक श्री. गिरीश जी रानडे व कार्यक्रमासाठी शाळा समितीच्या अध्यक्षा माननीय डॉक्टर माधवीताई मेहेंदळे या उपस्थित होत्या. प्रशालेच्या प्राचार्या डॉक्टर सुलभा विधाते यांनी रोटरी कडून हा स्मार्ट बोर्ड स्वीकारला या कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन श्री. अद्वैत जगधने सर यांनी केले. कार्यक्रमासाठी सैनिकी परिवार तसेच पुणे मेट्रो रोटरीचे सदस्य उपस्थित होते.

 

बुधवार, दिनांक : १७ मार्च २०२१ रोजी सैनिकी शाळेत Air Wing N.C.C.Flag Ceremony सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला, या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी Group Captain R. S. Jadhav F (P) Commanding officer 3 MAH. Air Squadran NCC Pune, MWO (HFO) S. M. Labade ( Affiit) व त्यांचे सहकारी अधिकारी, शाळेच्या प्राचार्या डॉ. सुलभा विधाते, उपमुख्याध्यापक श्री.अनंत कुलकर्णी, पर्यवेक्षक श्री. शाम नांगरे व श्री. संदीप पवार व सर्व शिक्षक, तसेच कॅडेट कु. जान्हवी बर्वे , कु. सुरभी पाठक, कु. आर्या चोरघे  उपस्थित होते. प्रमुख अतिथींच्या हस्ते मा. प्राचार्या डॉ. सुलभा विधाते यांच्याकडे N.C.C ध्वज प्रदान करण्यात आला.

सकाळ वर्तमानपत्रात -” करियर ‘ती’ चे ” या सदरात प्रशालेच्या प्राचार्या मा. डॉ. सुलभा नितीन विधाते यांची लेखमाला …...

दि. ६ जानेवारी २०२१ 

दि. १३  जानेवारी २०२१ 

दि. २० जानेवारी २०२१ 

दि. १७ मार्च २०२१

सैन्य प्रशिक्षण देणारी म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा ही सामजिक बांधिलकीचे भान ही देते. याच सामाजिक जाणिवेचे दर्शन महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून शाळेच्या विद्यार्थिनींनी सैन्य गणवेशात कोरोना विषयी जनजागृती करणारा संदेश जनतेला दिला. अशी सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या विद्यार्थिनींचा आम्हा सर्वांना अभिमान आहे.

 

 

पुणे महानगरपालिका आणि स्टेट इक्वेस्ट्रीयन असोसिएशनतर्फे आयोजित पुणे महापौर चषक राज्यस्तरीय अश्वारोहण स्पर्धेत म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेतील विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. शाळेतील एकूण ११ विद्यार्थिनी या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या, त्यापैकी ६ विद्यार्थिनींनी पदकांची कमाई केली आहे. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांच्या हस्ते झाले.

दिग्विजय हॉर्स रायडिंग अ‍ॅकॅडमी, शिवसृष्टी, कात्रज आंबेगाव येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. अश्वारोहणातील ड्रसाज, शो-जंपिंग आणि जिमखाना इव्हेंटस् अशा तीन प्रकारांत ही स्पर्धा झाली. अकलूज, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, ठाणे, मुंबई आणि पुणे अशा विविध भागांतून ९ संघातील १६० खेळाडू सहभागी झाले होते.

महापौर चषक पुणे राज्यस्तरीय अश्वारोहण स्पर्धेत म.ए.सो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेतील विद्यार्थिनींनी उज्वल कामगिरी केली एकूण ११ विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता.

श्रद्धा वणवे हिने २ सुवर्ण पदके, १ रौप्य पदक तसेच बेस्ट रायडर ट्रॉफी व दहा हजार रुपयांचे रोख पारितोषिक मिळवले.

सिद्धी टाकळकर हिने एक सुवर्ण आणि २ कांस्य पदके मिळविली.

राजकुँवर मोहितेने एक रौप्य आणि एक कांस्य पदकाची कमाई केली.

मेघना चव्हाणने दोन तर मयुरी पवारने एक सुवर्ण पदक मिळवले.

अनुष्का मस्के हिला एक रौप्य पदक मिळाले.

शाळेतील रसिका देशमुख,ओवी गुरव,श्रावणी बामगुडे,तृषा कटकधोंड आणि साक्षी कारळे या विद्यार्थिनींनी देखील या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला.

या विद्यार्थिनींना श्री. गुणेश पुरंदरे आणि श्री. कुणाल सर यांनी मार्गदर्शन केले.

सर्व खेळाडू व त्यांचे मार्गदर्शक यांचे अभिनंदन!

पुणे, दि. ५ : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेत शिक्षण घेतलेल्या दोन विद्यार्थिनींची भारतीय सैन्यदलात अधिकारी म्हणून निवड झाली आहे. कु. दामिनी दिलीप देशमुख हिची भारतीय वायूसेनेत तर कु. पल्लवी सुनील काळे हिची भारतीय तटरक्षक दलामध्ये निवड झाली आहे.

कु. दामिनी ही इ. १२ वी च्या परीक्षेत शाळेत सर्वप्रथम आली होती. धनुर्विद्या आणि किक-बॉक्सिंग या खेळांमध्ये तिने राज्यस्तरावर चमकदार कामगिरी करून अनेक पारितोषिके पटकावली आहेत. सैन्यात जाण्याचे आपले स्वप्न पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना दामिनीने या यशाचे श्रेय आपली शाळा आणि शिक्षकांना दिले आहे. “आज आभार नाही मानणार, तुमच्या ऋणातच राहायला आवडेल” असे तिने म्हटले आहे.

कु. पल्लवीने इ. १० वी च्या परीक्षेत शाळेत प्रथम क्रमांक मिळविला होता. तिनेही किक-बॉक्सिंगमध्ये राज्यस्तरीय स्पर्धा गाजवल्या आहेत. भारतीय तटरक्षक दलामध्ये असिस्टंट कमांडंट पदासाठी निवड झाली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षेत ती देशात दुसरी आली आहे.

म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेतून शिकून बाहेर पडलेल्या दोन विद्यार्थिनींची एकाच दिवशी सैन्यदलात अधिकारी म्हणून निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यांच्या निवडीने राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला गेला आहे. शाळा स्थापन झाल्यापासून गेल्या २२ वर्षात शाळेच्या १५ माजी विद्यार्थिनींची सैन्यदलात निवड झाली आहे.

कु. दामिनी आणि कु. पल्लवी या दोघींच्या यशाबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री. राजीव सहस्त्रबुद्धे, शालासमितीच्या अध्यक्षा डॉ. माधवी मेहेंदळे, शाळेच्या महामात्रा डॉ.मानसी भाटे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या प्राचार्या डॉ. सुलभा विधाते, शाळेचे कमांडंट ग्रुप कॅप्टन विजय कुलकर्णी (निवृत्त) आणि शिक्षकांनी अभिनंदन केले असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

या दोघींच्या यशाबद्दल शाळेत पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला.

म.ए.सो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेत आयोजित करण्यात आलेले ‘शौर्य’ साहसी क्रीडा प्रशिक्षण शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिराच्या पारितोषिक वितरण समारंभाला म.ए.सो. क्रीडावर्धिनीचे समन्वयक प्रा. शैलेश आपटे व महामात्र श्री. सुधीर भोसले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
शाळेच्या महामात्रा डॉ. मानसी भाटे, शाळेच्या प्राचार्या डॉ. सुलभा विधाते, शाळेचे कमांडंट ग्रुप कॅप्टन विजय कुलकर्णी, शाळेचे उपमुख्याध्यापक अनंत कुलकर्णी, पर्यवेक्षक श्याम नांगरे व संदीप पवार या प्रसंगी उपस्थित होते.

प्रा. शैलेश आपटे यांनी आपल्या भाषणात, शौर्य शिबिरातून मुलांनी आपण टी.व्ही. व मोबाईलशिवाय देखील दूर राहू शकतो हे सिद्ध केले आहे. मुलांनी मैदानावर रोज किमान २ तास तरी खेळलेच पाहिजे असे सांगितले. या प्रसंगी सर्व शिबिरार्थींचा प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. शिबिरार्थी व त्यांच्या पालकांनी देखील या वेळी मनोगत व्यक्त केले.

लहान वयातच साहसाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांचे व्यक्तिमत्व विकसित होऊन त्यांच्यात स्वयंशिस्त निर्माण व्हावी यासाठी शौर्य शिबिरात घोडेस्वारी, रायफल शूटिंग, धनुर्विद्या,ऑबस्टॅकल, वॉल क्लायंबिंग, रोप मल्लखांब इ. साहसी क्रीडा प्रकार तसेच शिल्पकला, रांगोळी, वारली पेंटिंग, विविध व्यक्तिमत्व विकसन व्याख्याने यांचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिबिराचे उपप्रमुख महेश कोतकर यांनी केले तर संदीप पवार यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. रुपाली लडकत यांनी केले.

म. ए. सो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा कासार आंबोली, मुळशी, येथे शौर्य शिबिराची उत्साहात सुरुवात झाली, या शिबिराचे उद्घाटन म. ए. सो. क्रीडावर्धिनी चे महामात्र प्रा. श्री. सुधीर भोसले यांच्या शुभहस्ते झाले. या प्रसंगी शाळेच्या प्राचार्या डॉ. सुलभा विधाते, कमांडंट ग्रुप कॅप्टन श्री. विजय कुलकर्णी, उपमुख्याध्यापक श्री. अनंत कुलकर्णी, पर्यवेक्षक श्री श्याम नांगरे. श्री. संदीप पवार , शिबिरप्रमुख श्री. भाऊसाहेब मार्तंड, उपप्रमुख श्री. महेश कोतकर उपस्थित होते. अतिथी मनोगतात प्रा. सुधीर भोसले यांनी या शिबिरातून मुलांमध्ये साहसाची आवड निर्माण करून व्यक्तिमत्त्व विकासासाठी स्वयंशिस्त निर्माण करणे यासाठी घोडेस्वारी,रायफल शूटिंग, धनुर्विद्या, आॅबस्टॅकल , वाॅल क्लांयबिंग, रोप मल्लखांब, इ. साहसी व शिल्पकला, रांगोळी, वारली पेंटिंग, विविध व्यक्तिमत्व विकसन व्याख्याने यांचे आयोजन करण्यात आले आहे असे सांगितले, शाळेचे कमांडंट ग्रुप कॅप्टन श्री. विजय कुलकर्णी यांनी ही शिबिरार्थींना शुभेच्छा दिल्या , या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. सुलभा विधाते यांनी शौर्य शिबिराचे महत्त्व सांगितले, शिबिरातील दिनक्रम सौ. रूपाली लडकत यांनी सांगितला, आभार श्री. साईनाथ जगदाळे यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. महेश कोतकर यांनी केले.

दक्षिण कोरिया येथे झालेल्या नवव्या एशियन योग चॅम्पियनशिप स्पर्धेत मुळशी तालुक्याची सुकन्या व आंतरराष्ट्रीय योगासन खेळाडू कु. श्रेया शंकर कंधारे हिने भारत देशाला सुवर्णपदक मिळवून दिल्याबद्दल म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या प्राचार्या डॉ. सुलभा विधाते यांच्या हस्ते कु.श्रेयाचा सन्मानचिन्ह,शाल ,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच श्रेयाची आई सौ.वर्षा कंधारे यांचा ही सन्मान करण्यात आला याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते श्री.नंदुशेठ भोईर ,श्री.सुभाष शिंदे श्री.महादेव काटे .माण चे माजी उपसरपंच श्री.तानाजी पारखी ,श्री.सूर्यकांत साखरे ,श्री.नितिन विधाते, उपमुख्याध्यापक श्री.अनंत कुलकर्णी, पर्यवेक्षक श्री.शाम नांगरे ,श्री.संदीप पवार हे उपस्थित होते , याप्रसंगी सैनिकी शाळेतील विद्यार्थिनीं प्रतिनिधींना मा.प्राचार्या डॉ.सुलभा विधाते व कु.श्रेया कंधारे यांच्या हस्ते Rank देण्यात आली,यानंतर कु.श्रेया कंधारे हिच्या योगासनांच्या प्रात्यक्षिकाने सर्व विद्यार्थिनींना व पालक व शिक्षकांना मंत्रमुग्ध केले.आपल्या मनोगतात कु्.श्रेया कंधारे हिने आपण ८ते १० तास सराव करीत असल्यानेच तसेच आई वडिलांच्या , शिक्षक, मार्गदर्शक, डॉक्टर यांच्या प्रोत्साहनामुळेच हे यश मिळाल्याचे सांगितले ,प्रास्ताविकात मा.प्राचार्या डॉ.सुलभा विधाते यांनी कु.श्रेया सारखे खेळाडू आपले आदर्श असले पाहिजेत असे सांगितले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा विभाग प्रमुख श्री.संदीप पवार व श्री.शाम नांगरे यांनी केले, कार्यक्रमाचे आयोजन क्रीडा विभाग प्रमुख श्री.संदीप पवार व सर्व सहकारी शिक्षकांनी केले.

‘कसबा पेठ गणपती’, पुण्याचा मानाचा पहिला गणपती. याच्या गणेश विसर्जनात आपल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची ‘राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा, कासार-आंबोली’, या प्रशालेतील मुलींनी रोप मल्लखांबाचे चित्त थरारक प्रात्यक्षिके पुण्यातील लाखो लोकांसमोर सादर केली. सदर मिरवणुकीत पुण्याचे खासदार मा. गिरीशजी बापट, तसेच पुणे महानगर पालिकेचे महापौर मा. मुक्ता टिळक, माजी विद्यार्थिनी व कसबा पेठ नगरसेविका सौ. गायत्री खडके यांनी भेट दिली. तसेच या मिरवणुकीत संस्थेचे नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री. राजीवजी सहस्त्रबुद्धे, नियामक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. माधव भट, नियामक मंडळाचे सदस्य व शालासमिती सदस्य श्री बाबासाहेब शिंदे, प्रशालेच्या शाला समिती अध्यक्षा डॉ. माधवीताई मेहेंदळे, शाला समिती महामात्रा डॉ. मानसी भाटे तसेच प्रशालेच्या प्राचार्या डॉ. सुलभा विधाते , प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री. अनंत कुलकर्णी, पर्यवेक्षक श्री. श्याम नांगरे, व श्री. संदीप पवार, तसेच प्रशालेतील शिक्षकगण व पालक उपस्थित होते. नियामक मंडळ सदस्य ऍडव्होकेट नेवसे सर यांचे महत्वाचे सहकार्य लाभले.

सालाबाद प्रमाणे यंदाही दि. २ सप्टेंबर ते ३ सप्टेंबर २०१९ रोजी राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेमध्ये गणेशोत्सव अत्यंत उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणामध्ये साजरा करण्यात आला. इयत्ता दहावी अ व ब मधील विद्यार्थिनींनी गणेशोत्सवाचे पूर्ण नियोजन केले. सदर कार्यक्रमांमध्ये धार्मिक विधी बरोबरच सांस्कृतिक कार्यक्रम, आगमनाची मिरवणूक, विसर्जनाची मिरवणूक आणि शिक्षक व इतर सर्वांचा सहभाग त्यामध्ये घेण्यात आला. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी सकाळी साडेसात वाजता गणेश मिरवणूक काढण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांच्या ढोल पथकाने नाद पूर्ण वादन करून, भक्तिमय वातावरणामध्ये गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. सकाळची आरती मा. मुख्याध्यापिका डॉ. सौ सुलभा विधाते व मा. नितीन विधाते यांच्या हस्ते करण्यात आली. संध्याकाळी सहा ते आठ या वेळेत विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यामध्ये १० वीच्या विद्यार्थिनींनी इयत्तानुसार इतर मुलींच्या खेळाचे आयोजन केले होते. याप्रसंगी शिक्षक व मेट्रन यांचे देखील खेळ घेण्यात आले. या गणेशोत्सवाचा एक बिंदू असणारा मुलींचा नृत्यप्रकार दहावी अ व दहावी ब च्या मुलींनी सादर केला. दिनांक 3 रोजी सकाळी पालक-शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष काटे मॅडम व इतर सदस्य यांनी श्री. गणेशाची आरती केली यानंतर पालक शिक्षक संघाच्या वतीने सर्व विद्यार्थिनींना प्रसादाचे वाटप करण्यात आले. सकाळी नऊ ते दहा या वेळात गणेशाची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली व या विसर्जन मिरवणूक नंतर गणेशोत्सवाची सांगता झाली. शाळेतील दीड दिवसांचा गणेशोत्सव अत्यंत उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला. सदर उत्सवाचा देखावा करताना विद्यार्थिनींनी काही महत्त्वाच्या गोष्टींचा विचार केला होता डॉक्टर अब्दुल कलाम यांचे स्वप्न व्हिजन ट्वेंटी-ट्वेंटी यावर आधारित देखावा साजरा करण्यात आला होता यामध्ये प्रगतीचे रूप असणारी पुणे मेट्रो त्याचबरोबर इस्रोचे चांद्रयान 2, चांद्रयान-1, इतर मोहिमा आणि अद्ययावत असणारे आधुनिक शहर ही संकल्पना साकार करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या प्रयत्नांमधून शाडूच्या मातीपासून मेट्राच्या कॅप्टनच्या वेषातील मंगलमुर्ती स्वतः तयार केली होती. संपूर्णपणे गणपतीची मूर्ती इको फ्रेंडली करण्याचा मुलींचा आटोकाट प्रयत्न होता. सदर कार्यक्रमासाठी शाळेच्या प्राचार्या डॉक्टर सौ सुलभा विधाते मॅडम,शाळेचे उपमुख्याध्यापक श्री कुलकर्णी सर, पर्यवेक्षक श्री नांगरे सर व श्री पवार सर यांच्याबरोबरच शाळेतील इतर शिक्षक वृंद यांनी याकामी महत्त्वाचे व मोलाचे सहकार्य केले. इयत्ता दहावीचे वर्गशिक्षक श्री अद्वैत जगधने व रेखा रायपूरकर यांनी या सर्व कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन व नियोजन केले होते. सालाबाद प्रमाणे यंदाही दि. २ सप्टेंबर ते ३ सप्टेंबर २०१९ रोजी राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेमध्ये गणेशोत्सव अत्यंत उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणामध्ये साजरा करण्यात आला. इयत्ता दहावी अ व ब मधील विद्यार्थिनींनी गणेशोत्सवाचे पूर्ण नियोजन केले . सदर कार्यक्रमांमध्ये धार्मिक विधी बरोबरच सांस्कृतिक कार्यक्रम, आगमनाची मिरवणूक ,विसर्जनाची मिरवणूक आणि शिक्षक व इतर सर्वांचा सहभाग त्यामध्ये घेण्यात आला. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी सकाळी साडेसात वाजता गणेश मिरवणूक काढण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांच्या ढोल पथकाने नाद पूर्ण वादन करून, भक्तिमय वातावरणामध्ये गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. सकाळची आरती मा. मुख्याध्यापिका डॉ. सौ सुलभा विधाते व मा. नितीन विधाते यांच्या हस्ते करण्यात आली. संध्याकाळी सहा ते आठ या वेळेत विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यामध्ये १० वीच्या विद्यार्थिनींनी इयत्तानुसार इतर मुलींच्या खेळाचे आयोजन केले होते. याप्रसंगी शिक्षक व मेट्रन यांचे देखील खेळ घेण्यात आले. या गणेशोत्सवाचा एक बिंदू असणारा मुलींचा नृत्यप्रकार दहावी अ व दहावी ब च्या मुलींनी सादर केला. दिनांक 3 रोजी सकाळी पालक-शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष काटे मॅडम व इतर सदस्य यांनी श्री. गणेशाची आरती केली यानंतर पालक शिक्षक संघाच्या वतीने सर्व विद्यार्थिनींना प्रसादाचे वाटप करण्यात आले. सकाळी नऊ ते दहा या वेळात गणेशाची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली व या विसर्जन मिरवणूक नंतर गणेशोत्सवाची सांगता झाली. शाळेतील दीड दिवसांचा गणेशोत्सव अत्यंत उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला. सदर उत्सवाचा देखावा करताना विद्यार्थिनींनी काही महत्त्वाच्या गोष्टींचा विचार केला होता डॉक्टर अब्दुल कलाम यांचे स्वप्न व्हिजन ट्वेंटी-ट्वेंटी यावर आधारित देखावा साजरा करण्यात आला होता यामध्ये प्रगतीचे रूप असणारी पुणे मेट्रो त्याचबरोबर इस्रोचे चांद्रयान 2, चांद्रयान-1, इतर मोहिमा आणि अद्ययावत असणारे आधुनिक शहर ही संकल्पना साकार करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या प्रयत्नांमधून शाडूच्या मातीपासून मेट्राच्या कॅप्टनच्या वेषातील मंगलमुर्ती स्वतः तयार केली होती. संपूर्णपणे गणपतीची मूर्ती इको फ्रेंडली करण्याचा मुलींचा आटोकाट प्रयत्न होता. सदर कार्यक्रमासाठी शाळेच्या प्राचार्या डॉक्टर सौ सुलभा विधाते मॅडम,शाळेचे उपमुख्याध्यापक श्री कुलकर्णी सर,पर्यवेक्षक श्री नांगरे सर व श्री पवार सर यांच्याबरोबरच शाळेतील इतर शिक्षक वृंद यांनी याकामी महत्त्वाचे व मोलाचे सहकार्य केले. इयत्ता दहावीचे वर्गशिक्षक श्री अद्वैत जगधने व रेखा रायपूरकर यांनी या सर्व कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन व नियोजन केले होते .

Rashtriya Krida Din- 29 Aug. 2019

Scroll to Top
Skip to content