आनंददायी शनिवार उपक्रमाअंतर्गत सामाजिक रक्षाबंधन…
आनंदायी शनिवार या उपक्रमाअंतर्गत (इ. 8 वी A/B) शनिवार, दि. २४ ऑगस्ट २०२४ रोजी, म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा, कासार आंबोली, येथील विद्यार्थिनींनी कातकरी वस्तीमध्ये जाऊन सामाजिक रक्षाबंधन साजरे करत मुलांना खाऊ वाटप केले. विद्यार्थिनींनी या वस्तीतील प्रत्येक घरात जाऊन कुटुंबातील सर्व सदस्यांना राख्या बांधल्या तसेच येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत व अंगणवाडी येथील विद्यार्थ्यांना राख्या बांधल्या. कातकरी वस्तीतील या उपक्रमात जिल्हा परिषदेचे ज्येष्ठ शिक्षक सुदाम राजाराम पवार यांनी विशेष सहकार्य केले होते. प्रशालेच्या विद्यार्थिनींना कातकरी वस्तीतील विद्यार्थी, त्यांचे सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक स्थिती याबद्दल माहिती सांगितली. तसेच प्रशालेतील रक्षाबंधन याविषयी विद्यार्थ्यांना व पालकांना माहिती सांगितली.
प्रशालेच्या अध्यापिका दिपाली आंबेकर यांनी विद्यार्थ्यांना बोधकथा सांगितली. प्रत्येक घरात जाऊन विद्यार्थिनींनी भेट दिली. कार्यक्रमाचे आभार भाऊसाहेब मार्तंड यांनी केले. या कार्यक्रमासाठी सुनीता शिंदे, मंगेश पाटील व राम घाईत हे सुद्धा उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी एकूण ८१ विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
या पद्धतीने सामाजिक रक्षाबंधन हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.








दिव्यांग बांधवांना राखी बांधताना आपल्या मुली सोबत त्यांच्यासाठी खाऊ न्यायला विसरल्या नाही…










भर पावसात मुलींना कातकरी वस्ती, मतिमंद शाळा तसेच वृक्षांना रक्षाबंधन केले. सैनिकी परिवारातील मेस, security, माळी कामगार सर्वांना राख्या बांधून बंधुत्वाचे नाते जपले.









