ग्रामस्वच्छता अभियान
दिनांक 27 सप्टेंबर 2025 रोजी जागतिक पर्यटन दिनानिमित्त ‘राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा’ येथील सर्व कॅडेट्स, कर्मचारी यांनी कासार आंबोली येथे ग्रामस्वच्छता अभियान राबविले. गावातून घोषणा देत, हातात घोषवाक्य फलक घेऊन रॅली काढली. सर्वांनी कासार आंबोली ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा, पद्मावती देवी मंदिर आणि विठ्ठल मंदिर या ठिकाणी स्वच्छता केली. स्वच्छते संदर्भात विविध घोषणा देऊन जनजागृती केली. स्वच्छतेचे महत्त्व सांगितले. कासार आंबोली या गावातील मान्यवरांनी कॅडेटचे तसेच शिक्षक वृंदांचे स्वागत केले.
या कार्यक्रमांमध्ये शाळेचे कमांडंट एविएन विंग कमांडर श्री. एम. यज्ञरामन, प्राचार्या सौ. ज्योती खिरीड, सीनियर मास्टर श्री. संदीप पवार, स्वच्छ शाळा समिती प्रमुख सौ. सावित्री पाटील, गाईड कॅप्टन दिपाली आंबेकर, सर्व शिक्षक वृंद यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.⚜️⚜️










