१४ एप्रिल – म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमाची सुरुवात महामानवाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व अभिवादन करून झाली. ज्येष्ठ शिक्षक श्री. अद्वैत जगधने यांनी बुद्ध वंदना म्हटली. त्यानंतर प्रशालेतील शिक्षिका सौ. मंजिरी पाटील यांनी ‘हीच आमची प्रार्थना’ म्हटली व त्यांच्या समवेत सर्व कॅडेटसनेही म्हटली. इयत्ता अकरावीची कॅडेट समिक्षा केळगावकर हीने डॉ. बाबासाहेबांविषयी तिचे विचार व्यक्त केले. प्रशालेतील शिक्षक श्री. शिवदास कापुरे यांनी डॉ. बाबासाहेबांचा जीवनपट विद्यार्थ्यांसमोर सांगितला तसेच श्री. अद्वैत जगधने यांनी बाबासाहेबांचे वेळेचे नियोजन, अभ्यास, करुणा, सामाजिक बांधिलकी, स्व-जाणीव, देशभक्ती इ. वेगवेगळ्या गुणांचे उदाहरणासह महत्व सांगितले. प्रशालेचे कमांडंट एविएन विंग कमांडर म. यज्ञरामन सर यांनी अध्यक्षीय भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जागतिक स्तरावर असणारे महत्व समजावून सांगितले. सदर कार्यक्रमाचे नियोजन प्रशालेतील परिपाठ विभागाने केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन श्री. गजानन पाटील यांनी केले.
सदर कार्यक्रमासाठी प्रशालेचे कमांडंट एविएन विंग कमांडर म. यज्ञरामन, प्रशालेच्या प्राचार्या श्रीमती पूजा जोग, प्रशालेचे पर्यवेक्षक व पी आर ओ श्री. संदीप पवार तसेच प्रशालेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, मेट्रन्स व सैनिकी परिवारातील सदस्य उपस्थित होते.

















