दिनांक 08/01//2026 रोजी
भास्करराव कर्वे स्मृती करंडक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा 2025-26 (वर्ष 11 वे )
विषय : कनिष्ठ महाविद्यालयीन गट : (इयत्ता 11वी व 12वी)
राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा कासार आंबोली येथील इयत्ता अकरावीच्या चार कॅडेट्स सहभागी झाल्या होत्या. त्याचबरोबर इतर शाळेतील एकूण कनिष्ठ व वरिष्ठ गट मिळून 150 विद्यार्थ्यांचा सहभाग होता. त्यात पुढील विषयांवर विद्यार्थ्यांनी आपली मते व्यक्त केली
1) वाचन संस्कृती आणि जीवनमूल्ये
2) प्रभाते मनीं राम चिंतीत जावा!
3) भारताच्या विश्वविजेत्या रणरागिणी
प्रशालेतील कॅडेट शौर्य उदावंत, कॅडेट अपूर्वा केंजळे, कॅडेट ऋतुजा सिंकर, कॅडेट दिव्या शिरसकर या कॅडेट्सनी सहभाग घेतला. आपल्या प्रशालेतील कॅडेट शौर्य उदावंत हिला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले आहे. त्याबद्दल तिचे व मार्गदर्शक शिक्षिका सौ. वैशाली शिंदे व कु. निकिता जोरी यांचे अभिनंदन. शाळेचे कमांडंट एविएन विंग कमांडर यज्ञरामन सर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. ज्योती खिरीड मॅडम, सिनियर मास्टर श्री संदीप पवार, स्पर्धा विभाग प्रमुख सौ. वैशाली शिंदे, सौ दिपाली भावसार यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.









