म.ए.सो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा कासार आंबोली ता.मुळशी च्या इयत्ता ९ वी च्या ५० विद्यार्थिनी ,शाळेचे पदाधिकारी व शिक्षक यांनी सुतार वाडी येथील आदित्य प्रांगण संस्कार प्रतिष्ठान मधील मतिमंद मुलांच्या शाळेतील दिव्यांग मुलांना राखी बांधून खाऊ वाटप करत सामाजिक बांधिलकी चा संदेश दिला, दिव्यांग बालकांच्या चेह-यावरचा आनंद पाहून व त्यांच्यामध्ये असणाऱ्या विविध क्षमता पाहून सैनिकी शाळेच्या विद्यार्थिनी भारावून गेल्या, या प्रसंगी संस्कार प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष श्री.उल्हास केंजळे, मुख्याध्यापक श्री.मच्छिंद्र जाधव, सैनिकी शाळेच्या कॅंपस डायरेक्टर सौ.गीतांजली बोधनकर, उपमुख्याध्यापक श्री.अनंत कुलकर्णी, पर्यवेक्षक श्री.संदीप पवार, सौ.मंजिरी पाटील, श्री.महेश कोतकर, श्री.प्रमोद झुरमुरे, श्री.भाऊसाहेब मार्तंड हे शिक्षक उपस्थित होते. या प्रसंगी ज्येष्ठ शिक्षक श्री. भाऊसाहेब मार्तंड व काही दिव्यांग विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते गाऊन सर्वांची मने जिंकली, या कार्यक्रमाचे नियोजन सैनिकी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुवर्णा कांबळे यांच्या मार्गदर्शनानुसार शिक्षकांनी केले होते.




