570 cadets of our school witnessed launching of chandrayaan… Live streaming… A very exciting moment for us.

दि. ११ जुलै २०२३ रोजी परिपाठात जागतिक लोकसंख्या दिन या विषयी प्रशालेचे अध्यापक, भूगोल विभाग प्रमुख श्री. अद्वैत जगधने यांनी माहिती सांगितली. मानवाची उत्पत्ती, प्रजाती, राहणीमान आणि मानवाची उत्क्रांती या विषयी सरांनी मोलाची माहिती विद्यार्थिनींस सांगितली. लोकसंख्या आपत्ती कि संपत्ती या विषयी सरांनी आपली भूमिका मांडली.

आपल्या प्रशालेची विद्यार्थिनी कॅडेट गीता गणपत धनवडे, इयत्ता नववी (ब) हिची एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स (Asia Book of Records) या आशिया खंडातील अतिशय मानांकित असणाऱ्या पुस्तकामध्ये रेकॉर्डची नोंद झाली आहे. सायन्स विषयामध्ये कॅडेट गीता गणपत धनवडे हिने आशिया खंडामध्ये सर्वात कमी वयात म्हणजेच अकरा वर्षे पाच महिने पाच दिवस या छोट्याशा कालावधीमध्ये केलेल्या वेगवेगळ्या महत्त्वपूर्ण संशोधनाची दखल घेऊन रेकॉर्डची नोंद या पुस्तकात करण्यात आली आहे. कॅडेट गीता गणपत धनवडे हिने आतापर्यंत वेगवेगळ्या संशोधनामध्ये, विभागामध्ये वीस अवॉर्ड्स मिळविले आहेत. यातील पोलिसांसाठी केलेले संशोधन विशेष उल्लेखनीय आहे. वेगवेगळ्या विषयांमध्ये उल्लेखनीय आणि भरीव कार्य करणाऱ्या व्यक्तींची नोंद या पुस्तकामध्ये ठेवली जाते.

तसेच गीताच्या कार्याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड (India Book of Records) मध्ये दखल घेऊन नोंद करण्यात आली आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स या पुस्तकांमध्ये तसेच वेबसाईट वरती आणि सुदर्शन टी.व्ही. वरती सदरील बातमी प्रसारित झाली आहे.

दिनांक 11 जुलै 2023 रोजी शाळेच्या ए.टी.एल. वर्कशॉप या कार्यक्रमांमध्ये डॉ.दत्तात्रय नाईक (महान संशोधक आणि शास्त्रज्ञ) आणि डॉ. नेहा देशपांडे (लाईफ टाईम मेंबर म.ए.सो.) यांचे शुभ हस्ते कॅडेट गीता गणपत धनवडे हिचा शाळेतर्फे सत्कार करण्यात आला.

सदरील प्रोजेक्टसाठी ए.टी.एल. इन्चार्ज आणि उपप्राचार्य श्री. अनंत कुलकर्णी आणि सायन्स विभाग प्रमुख सौ. मंजिरी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. सैनिकी परिवारातर्फे कॅम्पस डायरेक्टर सौ. गीतांजली बोधनकर, प्राचार्या सौ. सुवर्णा कांबळे, उपप्राचार्य श्री. अनंत कुलकर्णी, विज्ञान विभाग प्रमुख सौ. मंजिरी पाटील, पर्यवेक्षक श्री. संदीप पवार आणि श्री. श्याम नांगरे यांनी कॅडेट गीताला शुभेच्छा दिल्या.

कॅडेट गीता गणपत धनवडे हिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा … !!

दिनांक ११ जुलै ते १३ जुलै २०२३ रोजी प्रशालेत अटल कार्यशाळा घेण्यात आली. दिनांक ११ जुलै रोजी बहुउद्देशीय सभागृहात कार्यक्रमाची सुरूवात झाली. प्रमुख अतिथी दत्तात्रय नाईक, नेहा देशपांडे होते रितिक मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा घेण्यात आली. प्रशालेतील विद्यार्थीनींना Electronic components, timer bot, LED sensor, digital scale, traffic light, याच बरोबर coding विषयी मार्गदर्शन करण्यात आले. Arduino वापरून प्रोग्रामिंग द्वारे ट्रॅफिक लाईट चे मोडेल विद्यार्थिनींनी कडून करून घेण्यात आले. या कार्यशाळेमध्ये प्रशालेतील विद्यार्थीनी स्वतः प्रात्यक्षिक करुन इतर विद्यार्थिनींना ही त्याबद्दल माहिती देतील असा उद्देश होता. यावेळी प्रशालेच्या कॅम्पस डायरेक्टर सौ. गीतांजली बोधनकर, प्राचार्या सौ.सुवर्णा कांबळे व उपप्राचार्य श्री. अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शाखाली ही कार्यशाळा घेण्यात आली.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या व्यक्तिमत्व विकास केंद्र पुणे मार्फत दिनांक २७ जून आणि १० जुलै २०२३ रोजी इयत्ता सहावी, सातवी आणि अकरावी करिता नवीन वातावरणाशी जुळवून घेणे आणि त्यातून स्व विकास साधणे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. व्यक्तिमत्व विकास केंद्राच्या मुख्य समन्वयक गिरीजा लिखिते मॅडम त्याचसोबत केंद्राचे तज्ञ प्रशिक्षक स्मिता लोकरे मॅडम, सुरेखा नंदे मॅडम, गायत्री वाणी मॅडम, प्रशालेच्या समुपदेशक सौ पियुषा सामंत आणि सौ श्रेया श्रीगोंदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर सत्र पार पडले.

प्रशालेतील विद्यार्थिनींनी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये काढलेली चित्र आर्टवॉलवर दिनांक ८ जुलै २०२३ रोजी प्रदर्शित करण्यात आली. विद्यार्थिनींच्या चित्रकलेला व्यासपीठ मिळावे यासाठी या आर्टवॉलची निर्मिती करण्यात आली आहे. विद्यार्थिनींना चित्रकलेची प्रेरणा मिळावी म्हणून अधूनमधून निवडक प्रसिद्ध चित्रकारांची चित्रदेखील या आर्टवॉलवर प्रदर्शित करण्यात येतात.

दि. ७ जुलै २०२३ रोजी प्रशालेचा २६ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास प्रशालेच्या शालासामिती अध्यक्षा मा. डॉ. माधवी मेहेंदळे उपस्थित होत्या. प्रशालेच्या निर्मितीपाठी संस्थेची भूमिका सांगून, शाळेतील जास्तीत जास्त मुलींनी येथील विविध सोयी सुविधांचा उपयोग करून घेत आपली प्रगती साकारावी असे उद् गार डॉ. मेहेंदळे यांनी काढले. या प्रसंगी प्रशालेतील कॅडेट्स च्या रँक प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आल्या. या निमित्ताने प्रशालेच्या विद्या दैनंदिनीचे प्रकाशन देखील करण्यात आले.

दि. ४ जुलै २०२३ रोजी पौड, ता. मुळशी येथे शिक्षक आमदार मा. श्री. जयंत आसगावकर यांनी सैनिकी शाळेची ऍथलेटिक्स राष्ट्रीय खेळाडू कॅडेट मुग्धा पाटे हिचा सत्कार केला व शाळेला शिक्षक आमदार निधीतून प्रिंटर भेट दिला, प्रिंटर स्विकारताना पर्यवेक्षक श्री.संदीप पवार राष्ट्रीय खेळाडू कॅडेट मुग्धा पाटे.

दिनांक ३ जुलै २०२३ रोजी शालेय परिपाठात गुरुपौर्णिमा साजरी केली. प्रशालेचे जेष्ठ शिक्षक श्री. अद्वैत जगधने यांनी विद्यार्थिनींना गुरुपौर्णिमेचे महात्म्य पटवून दिले. विद्यार्थिनींनी प्रशालेतील सर्व शिक्षकांना स्वतः तयार केलेले बुकमार्क भेट दिले. कार्यक्रमाचे सर्व संचालन विद्यार्थिनींनीच केले होते. या प्रसंगी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. सुवर्णा कांबळे, कॅम्पस डिरेक्टर सौ. गीतांजली बोधनकर यांनी देखील विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री.अनंत कुलकर्णी, पर्यवेक्षक श्री. श्याम नांगरे, श्री.संदीप पवार आणि सर्व शिक्षक उपस्थित होते.

रविवारी दिनांक २, ९ व २३ जुलै २०२३ रोजी प्रशालेत हॉबी क्लबचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थिनींच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून या उपक्रमाचे आयोजन केले जाते. यात स्कल्पचर, वारली पेंटिंग, रांगोळी, आर्ट अँड क्राफ्ट, ड्रॉईंग, फिल्म क्लब अशा विविध ऍक्टिव्हिटी घेण्यात आल्या. सदर उपक्रम दर रविवारी घेतले जातात. उपक्रम यशस्वी होण्यासाठी हॉस्टेल विभाग यांचे विशेष सहकार्य लाभले. उपक्रमांचे समन्वयक श्री महादेव मगर सर आहेत.

Shaurya Military Training, Adventure and Admission Camp – 2023 RLMSS….

Glimpses of –
Orientation to SSB Techniques, Medicals and a lot of field activities….
& Guest Lecture by Maj Smita Verma (Retd.)

ATL – Community Day 14 April – 2023 @ RLMSS

MES RLMSS ATL : Our Evolving Inclusive community outreach

ATL community day was celebrated in our school as per the call given by AIM Niti Aayog. This was celebrated on 13th April, 14th April and 15th April 2023.
On the first day of Celebration 13 April the interaction with community workers was organised in school.
The cadets interacted with sweepers, drainage cleaners, security guards, gardeners , electricians, plumbers, and washermen about their work profile and the problems faced during their work. One of the cadet Geeta dhanawade from standard 8 made a group and prepared and presented a gadget for disposal of the garbage which was one of the problems told by the sweepers like Used sanitary pads, stained dirty clothes, excreta of animals,etc
This interaction was an eye opener and created awareness about their responsibility to maintain a clean environment in their surroundings.
On the 2nd day of the program 14th April 2023 – the birth anniversary of Dr Babasaheb Ambedkar was celebrated with the children of community workers and teachers who reside in the school premises. Children enjoyed the program ‘fun with science projects’.

They were invited to see and learn the wonders of technology.They were given DIY kits, lago blocks and magnets and were asked to identify any problem and make solutions prototype models with it.
On 15th April around 25 students from Zilla Parishad schools of shindewadi and sutharwadi villages who were deprived and interested in learning new technology were invited. They were trained and mentored to get hands on experience like various activities such as “Do-it- yourself”, design thinking and introduction to 3D printing they were guided and mentored by school children of class 11 science stream.
The young inventors were built with ideas and made many designs using chart paper, LED bulbs and pencil cells.
It was interesting and opened a new horizon for them.
The educational and cultural bridges which have been * witness with our rural neighbours will be further enhanced in the time to come unity. This yearly event becomes a celebration of the spirit of unity in diversity.
‘Vasudhaiva kutumbakam’

A wonderful Passing Out Parade of RLMSS Pune in its all new and revised format…happened great here on 28 March 2023

‘Do so well – All the Best’ – for the Passing out March in Slow Time was performed and walked for the first time…

Shri Mitesh ji Ghatte, the RO & Chief Guest along with Sou. Dr. Madhavi ji Mehendale, Chairman SMC RLMSS graced the occasion and did the honors….vAh…

Great job by Ex Hav Shri Gajanan Mali – IC Mil Trg & Event Coord and Ex Hav Shri Balasaheb Chavan – Mil Inst & my Man Friday…

Felt so happy and immensely thankful..





https://www.youtube.com/live/Glnt6ovdzzU?feature=share

तरुणाईच्या सामर्थ्याचे दर्शन घडविणारा युवा चेतना दिन

लष्करी वेशात शिस्तबद्ध संचलन करत मान्यवरांना दिलेली मानवंदना, रिदम योगाद्वारे झालेले एकाग्रतेचे दर्शन, कराटे आणि अश्वारोहणातून दिसलेले धाडस, धनुर्विद्या आणि रायफल शूटिंगमुळे दिसून आलेली अचूकता, रोप मल्लखांबामुळे साधलेली लवचिकता, लेझमीच्या खेळातून साधलेली सांघिक भावना, मार्शल आर्टसच्या प्रशिक्षणातून झालेली स्वसंरक्षणाची तयारी बघून अचंबित झालेले प्रेक्षक असे दृश्य आज बघायला मिळाले, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ‘युवा चेतना दिना’च्या कार्यक्रमात. विद्या आणि बळाच्या आधारे आपण जग जिंकू शकतो, जगात वंदनीय ठरू शकतो हा संदेशच मएसोच्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या साहसी प्रात्यक्षिकांमधून या वेळी दिला आणि स्वामी विवेकानंदांना अभिप्रेत असलेला समर्थ भारत निर्माण करण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे हे दाखवून दिले.

स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे मएसो क्रीडावर्धिनीच्या माध्यमातून दरवर्षी ‘युवा चेतना दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने संस्थेच्या विविध शाखांमधले विद्यार्थी-विद्यार्थिनी विविध मैदानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करतात. यावर्षी मएसोच्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या प्रात्यक्षिकांनी सर्वांचीच मने जिंकली.

मएसो गरवारे महाविद्यालयाच्या मैदानावर आज (गुरुवार, दि. १२ जानेवारी २०२३) आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे मा. उपाध्यक्ष श्री. प्रदीपजी नाईक हे होते. आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू श्रीमती पूजा सहस्रबुद्धे-कोपरकर या प्रमुख अतिथी म्हणून तर समर्थ भारत संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. सुहास क्षीरसागर या वेळी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. संस्थेचे मा. उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे, नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळाचे सदस्य आणि मएसो क्रीडावर्धिनीचे मा. अध्यक्ष श्री. विजय भालेराव, संस्थेचे साहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

कोरोना महामारीमुळे सर्व निर्बंधांचे पालन करून मर्यादित उपस्थितीत व बंदिस्त जागेत मैदानी प्रात्यक्षिकांशिवाय या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दोन वर्षांनंतर हा कार्यक्रम मैदानावर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रात्यक्षिकांसह अतिशय उत्साहात पार पडला.

प्रमुख वक्ते श्री. सुहास क्षीरसागर यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील विविध प्रसंग सांगत त्यांच्या कार्याची महती विशद केली. ते म्हणाले की, महापुरूषांचे आयुष्य दीपस्तंभासारखे असते. एखाद्या विचाराचा ध्यास घेणे म्हणजे काय हे स्वामी विवेकानंदांच्या जीवनातून शिकायला मिळते. भारतीय जीवन पद्धती ही वेदांतावर आधारित आहे हे त्यांनी जगाला सांगितले. त्याग हे भारतीय संस्कृतीचे व्यवच्छेदक लक्षण आहे, आपली संपत्ती इतरांना उपयोगी पडली तरच जीवनात सुख आणि शांतता लाभू शकते, स्वतःपेक्षा दुसऱ्या व्यक्तीचा, समाजाचा, देशाचा विचार करण्याची शिकवण भारतीय संस्कृती देते, हे स्वामीजींनी जगाला पटवून दिले. आपल्या देशातील जनता स्वत्व विसरली आहे, भारताची जगभर कुचेष्टा सुरू आहे, त्यामुळे आपल्या लोकांना जागृत करण्यासाठी स्वामीजींनी देशभर प्रवास केला. मन, बुद्धी आणि मनगट बळकट असेल तरच जग जिंकता येते हे त्यांनी समजावून सांगितले. आजच्या पिढीने देखील आपल्या क्षमता ओळखण्याची गरज आहे कारण तीच यशाची गुरुकिल्ली आहे.

श्रीमती पूजा सहस्रबुद्धे-कोपरकर विद्यार्थ्यांना मर्गदर्शन करताना म्हणाल्या की, जीवनात यशस्वी होण्यासाठी आपले कुटूंब, गुरूजन आणि शाळा-महाविद्यालय यांचा पाठिंबा असणे अनिवार्य असते. त्यांच्याच पाठिंब्यामुळे मला टेबल टेनिस खेळाच्या क्षेत्रात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवता आले. त्याचबरोबर खेळामुळे मला काही महत्वाचे गुण शिकायला मिळाले ते म्हणजे ध्येय निश्चिती, सांघिक भावना, कठोर परिश्रम आणि अपयश पचवण्याची क्षमता. त्यामुळे सातत्याने कठोर परिश्रम केले तर यश निश्चितच मिळते.

कार्यक्रमाच्या सुरवातीला आर्कि. राजीव सहस्रबुद्धे यांनी युवा चेतना दिनाच्या आयोजना मागील भूमिका विशद केली. तर श्री. विजय भालेराव यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला.

या वेळी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये लक्षणीय कामगिरी करणाऱ्या संस्थेच्या शाखांमधील विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या विद्यार्थ्यांचा परिचय प्रा. शैलेश आपटे यांनी करून दिला.

मएसो रेणुका स्वरुप प्रशालेतील शिक्षिका श्रीमती शिरीषा जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर इंजि. सुधीर गाडे यांनी आभार प्रदर्शन केले.

A world of science’ revealed through experiments at MES Rani Lakshmibai Mulinchi Sainiki School

Kasar Amboli, 14 October 2022.

A ball floating in the air without any support, and watching the collision of the same ball with another ball next to each other, were some of the experiments amazed the audience present in the multipurpose hall of the school. Bernali’s principle of air velocity, the reflection of light in different mediums through the thyroscope and the law of momentum conservation when the oscillating Newton’s cradle collides with each other, Electromagnetic induction by means of Various concepts such as magnetic attraction were explained to the children through interesting experiments.
‘Atal Tinkering’ laboratory of M. E. S Rani Lakshmibai Mulinchi Sainiki Shala had organized a workshop on ‘The Joy Learning Science Through Experiments’ before the ‘Science Vachan Prerna Divas’.
Along with 378 girls cadets from Sainiki school, more than 150 students from various schools like Vidya Bhavan English Medium School, Sanskar School, Heritage International School, Elite International School and Sudarshan Vidyamandir participated in the workshop. Former Professor Shri. Bhagwan Chakradev who dedicated his life for the science exploration was the main guide and Mr. Keshavrao Deshpande along with Mr. Vijay Patil assisted him in the experiments.
Through this programme, the complex concepts of science were presented to the students in a very interesting manner and connected with their daily life. Sainiki School implemented an innovative concept of ‘Science Vachan Prerna Divas’ on Saturday 15th October by reading the various concepts presented in the programme. Sainiki School always organizes such programmes for the overall development of the rural students in its surrounding areas. On this occasion, the Sainiki School intends to bring all these schools together using the concept of ‘Cluster School’.
Mr. Ravindra Chaudhary, Cluster Head of Urawade Cluster , Mrs. Suvarna Kamble, Principal of Sainiki School, Commandant Mr. M. Yagyaraman were present for this programme. The programme was organized by ATL Head of the Department Mr. Anant Kulkarni and Head of Science Department Mrs. Manjiri Patil under the mentorship of Campus Director Mrs. Geetanjali Bodhankar . Mr. Anant Kulkarni, Vice Principal of the school thanked everyone and concluded the programme.

विजयादशमी संचलन ……. @ कासार अंबोली by RLMSS

शारदीय नवरात्रौत्सवाने आपणा सर्वांच्या जीवनात एकप्रकारचा आनंदोत्सव ओसांडून वाहतो असतो. या निमित्ताने, मएसो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा कासारअंबोली, येथे सोमवार दि.०३ ॲाक्टोबर २०२२ रोजी दु.३.०० ते ५.०० या वेळात सामाजिक भोंडला प्रशालेत आयोजित करण्यात आला. कौटुंबिक स्नेहमेळावा, मैदानावर गरबा, भेटीगाठी व चहापान असे या कार्यक्रमाचे स्वरुप होते. बऱ्याच मैत्रिणींच्या या कार्यक्रमामुळे भेटीगाठी झाल्यात.

गुरुवार, दिनांक ११ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा, कासार आंबोली ता. मुळशी, जि. पुणे,
संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना ‘हर घर झेंडा’ या उपक्रमांतर्गत कासार आंबोली गावामध्ये ग्रामपंचायतचे सर्व सदस्य सरपंच उपसरपंच यांसमवेत प्रभात फेरी काढून जनजागृतीपर पत्रके वाटून आणि घोषणा देत प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थिनींच्या घोष पथकाने लोकांना जागृत करण्यासाठी वातावरण निर्मिती केली आणि विद्यार्थिनिंनी घोषणा देत परिसर दणाणून सोडला…
हातात घेतलेले फलक लोकं उत्साहाने वाचत होते आणि उपक्रमाविषयी माहिती घेत होते.
प्रभात फेरीची सुरुवात प्रशालेच्या परिसरातून सुरू होऊन ग्रामपंचायत कासार आंबोली गावाच्या प्रांगणात सांगता झाली.
सदर कार्यक्रमास गावाचे सरपंच कुमार रणजित गायकवाड, उपसरपंच स्वप्नील कांबळे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, उपस्थित होते.
तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुवर्णा कांबळे, उपमुख्याध्यापक अनंत कुलकर्णी प्रशालेचे जेष्ठ शिक्षक अद्वैत जगधने, सुनीता शिंदे, भाऊसाहेब मार्तंड, रविराज थोरात, महादेव मगर तसेच प्रशालेतील हॉस्टेल विभागाच्या प्रियंका गुरव, शितल मार्तंड आणि प्रशालेचे सेवक पोपट कणगरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

मएसो राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेतर्फे
क्रांतीदिनी हुतात्म्यांना मानवंदना

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेतर्फे क्रांतीदिनानिमित्त आज (मंगळवार, दि. ९ ऑगस्ट २०२२) सकाळी हुतात्मा चौकातील हुतात्मा भास्कर पांडुरंग कर्णिक यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यात आले. शाळेतील विद्यार्थिनींनी सैनिकी वेशात हुतात्म्यांना मानवंदना दिली. इतिहास अभ्यासक मोहन शेटे यांनी यावेळी हुतात्मा कर्णिक यांच्या कार्याची सविस्तर माहिती उपस्थितांना करून दिली.

या वेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळाचे सदस्य मा. प्रल्हाद राठी, सैनिकी शाळेच्या महामात्रा डॉ. मानसी भाटे आणि सौ. चित्रा नगरकर, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुवर्णा कांबळे, कमांडंट विंग कमांडर यज्ञरमण आदी मान्यवरांनी हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र आणि पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली.

या प्रसंगी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दि. १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत देशभर राबविण्यात येणाऱ्या ‘हर घर तिरंगा’ अभियानाला अनुलक्षून संस्थेने तयार केलेल्या पत्रकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

सैनिकी शाळेतील विद्यार्थिनींच्या मानवंदनेने वातावरण भारावून गेले होते. वर्दळीच्या ठिकाणी आणि कामाच्या गडबडीत असतानादेखील अनेक नागरिक उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमाला उपस्थित होते.

इतिहास अभ्यासक मोहन शेटे यावेळी बोलताना म्हणाले, “देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्मा भास्कर कर्णिक यांच्यासारख्या असंख्य क्रांतिकारकांप्रती आजच्या क्रांतीदिनी कृतज्ञता व्यक्त करतानाच या स्वराज्याचे सुराज्यात परिवर्तन करण्याची प्रतिज्ञा करू या! देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनात निकराचा संघर्ष करण्यासाठी महात्मा गांधीजींनी १९४२ साली मुंबईत गवालिया टँक येथील सभेत ब्रिटिशांविरोधात ‘चले जाव’ची घोषणा केली आणि “करेंगे या मरेंगे” चा नारा दिला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी विविध मार्गांनी आंदोलने केल्यानंतर आता जुलमी ब्रिटिश साम्राज्य हादरवून टाकण्यासाठी जोरदार धमाका केला पाहिजे या भावनेतून भास्कर पांडुरंग कर्णिक आणि त्यांच्या साथीदारांनी पुण्यातील कँप परिसरात असलेल्या कॅपिटॉल आणि वेस्ट एन्ड या दोन चित्रपटगृहात दि. २४ जानेवारी १९४३ रोजी चित्रपटाचा खेळ चालू असताना रात्री ९.३० वाजता भास्कर पांडुरंग कर्णिक आणि त्यांच्या पाच साथीदारांनी ६ बॉम्बस्फोट घडवून आणले. त्यात ३ ब्रिटिश अधिकारी ठार झाले तर १८ जण जखमी झाले. या घटनेने ब्रिटिश सरकारला मोठा हादरा बसला. स्फोटासाठी वापरलेले बॉम्ब देहूरोड येथील दारुगोळा कारखान्यात तयार झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आणि पोलीसांनी भास्कर कर्णिक व त्यांच्या काही साथीदारांना अटक करून फरासखाना पोलीस ठाण्यात आणले गेले. त्यावेळी लघुशंकेचे निमित्त करून भास्कर कर्णिक बाजूला गेले आणि तेथे खिशातली सायनाईडची पूड खाऊन आत्मार्पण केले, तो दिवस होता ३१ जानेवारी १९४३. अशाप्रकारे कॅपिटॉल बॉम्ब खटल्यातील मुख्य दुवा नाहीसा झाल्यामुळे इतर क्रांतिकारकांची नावे पोलीसांना समजू शकली नाहीत. हुतात्मा भास्कर कर्णिक यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली पण देशाशी प्रतारणा केली नाही.”

संस्थेचे सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे यांनी कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रास्ताविकात स्वातंत्र्यपूर्वकाळात स्थापन झालेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कार्याची महती विशद केली.

शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुवर्णा कांबळे यांनी आभारप्रदर्शन केले.

सैनिकी शाळेत दीप अमावस्या उत्साहात साजरी….

प्राचीन भारतीय संस्कृतीचा वारसा जपत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेत आज गुरुवार दिनांक २८/०७/२०२२ रोजी दीप अमावस्या निमित्त शेकडो दिवे प्रज्वलित करत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रशालेच्या बोधचिन्हाच्या भोवती विविध प्रकारच्या समई, शेकडो दिवे प्रज्वलित करून विद्यार्थिनींनी अंधारावर मात करण्याचा संदेश दिला. सदर कार्यक्रमाची सुरुवात प्रशालेच्या कॅम्पस डायरेक्टर सौ. गीतांजली बोधनकर मॅडम व प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री अनंत कुलकर्णी सर यांनी दीप प्रज्वलित करून केली. प्रशालेतील हिंदी व संस्कृत विभाग प्रमुख श्री भाऊसाहेब मार्तंड सर यांनी विविध प्राचीन कथांच्या सहाय्याने विद्यार्थिनींना दीप अमावस्येचे महत्त्व सांगितले. या प्रसंगी प्रशालेतील स्कूल कॅप्टन, स्पोर्ट्स कॅप्टन तसेच काही शिक्षक प्रतिनिधी यांचे औक्षण करण्यात आले.आजच्या दिनाचे महत्त्व सांगताना कॅम्पस डायरेक्टर सौ.गीतांजली बोधनकर मॅडम यांनी दक्षिण भारतीय संस्कृती व महाराष्ट्रीयन संस्कृती यांचा मिलाफ करत दीप ‘ तिमिराकडून तेजाकडे’ जाण्याची प्रतिज्ञा सर्वांनी करावी अशी इच्छा व्यक्त केली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे पर्यवेक्षक श्री श्याम नांगरे सर यांनी केले तर आयोजन परिपाठ विभागाने केले.

Kargil Vijay Divas celebrated in Rani Laxmibai Girls Military School

The Senior Cadets of Maharashtra Education Society’s Rani Laxmi Bai Girls Military School enthusiastically organised and celebrated ‘Kargil Vijay Divas’ in the MP Auditorium of the School under the guidance of Military Training Wing of RLMSS.

The entire programme was planned and organised by Cadets of Class XII. A nice skit was presented by the Cadets on the tough life and Tour of Duty of an Indian Soldier while remembering the act of exemplary courage of our braveheart soldiers.

Cdt Pratiksha Lamjane and
Cdt Tanvi Nimbrate presented patriotic songs and poems.

Relevant information on ‘Operation Vijay’, ‘Operations Safed Sagar’ ‘Operation Badr’ was given by Cdt Bhumika and Cdt Sharon Susan along with the help of a beautiful PowerPoint presentation.

Cdt Prajakta Navale, Cdt Anagha Bahekar compered the event while Cdt Vedashree presented vote of thanks.


शनिवार, दिनांक 9 जुलै 2022 रोजी, म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा व उच्च माध्यमिक विद्यालय कासार आंबोली ता. मुळशी येथे आषाढी एकादशी निमित्त वर्गश: अभंग गायन स्पर्धा पालखी व वृक्ष दिंडीचे चे आयोजन केले होते, इयत्ता सहावीच्या मुलींनी पांडुरंग, रूक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत मुक्ताबाई, संत जनाबाई यांची वेशभूषा केली होती, अभंग गायन स्पर्धेत लहान गटांमध्ये इयत्ता 8 वी अ व मोठ्या गटात इयत्ता 10 वी अ ने प्रथम क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेचे परीक्षण उपप्राचार्य श्री. अनंत कुलकर्णी, पर्यवेक्षक श्री. श्याम नांगरे व श्री. संदीप पवार, सौ. अश्विनी मारणे यांनी केले , श्री. अद्वैत जगधने, श्री. भाऊसाहेब मार्तंड, श्री. अनंत कुलकर्णी, श्री. श्याम नांगरे, श्री. संदीप पवार, श्रीमती श्रेया देशपांडे, श्रीमती प्रियंका हजारे, श्रीम. प्रियंका गुरव व सौ. शितल मार्तंड यांनी ही अभंग म्हटले त्यानंतर अध्यक्षीय मनोगतात सौ. गीतांजली बोधनकर यांनी विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन करुन आषाढी एकादशीचे व पर्यावरणाचे महत्त्व समजावून सांगितले.
वृक्षारोपणाचे फायदे सांगणारी घोषवाक्यांच्या पाट्या हातात घेत वसतिगृह ते शाळा अश्वासहित पालखी काढण्यात आली होती, शाळेसमोर घोड्याने रिंगण पूर्ण केले त्यानंतर पर्यावरण व वृक्ष गीत गात भर पावसात वृक्ष दिंडी निघाली, कॅंपस डायरेक्टर सौ. गीतांजली बोधनकर, पर्यवेक्षक श्री. संदीप पवार, श्री. भाऊसाहेब मार्तंड, श्री. गजानन माळी, श्री. श्रीपाल चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले, या कार्यक्रमाचे नियोजन स्पर्धा प्रमुख सौ. वैशाली शिंदे, श्री. रविराज थोरात, श्री. भाऊसाहेब मार्तंड यांनी केले तर सौ. शीतल मार्तंड, श्रीम. प्रियांका गुरव व श्री. समीर जाधव यांनी विशेष कल्पना मांडून कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले. या प्रसंगी सैनिकी परिवारातील सदस्य उपस्थित होते.

7 July – रौप्य महोत्सवी वर्ष – सांगता समारंभ ….

 

म. ए. सो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा  व उच्च माध्यमिक विद्यालय कासार आंबोली येथे शाळेचा वर्धापनदिन व  रौप्यमहोत्सवी वर्ष सांगता समारंभ उत्साहात पार पडला, या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना व नृत्य दिग्दर्शिका  मा. सुचेता भिडे -चापेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी तथा उपसंचालक (अतिरिक्त कार्यभार)  श्री. महादेव कसगावडे, नाट्य कलाकार श्री. सुयोग कुंडलकर, सौ. आरती कुंडलकर, म. ए. सो संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, म. ए. सो. नियामक मंडळ अध्यक्ष आर्किटेक्ट श्री. राजीव सहस्रबुद्धे, शाला समिती अध्यक्षा डॉ. माधवी मेहेंदळे, संस्थेचे सचिव डॉ. श्री. भरत व्हनकटे, सहसचिव सुधीर गाडे, शाला समिती महामात्रा डॉ. मानसी भाटे  व प्रा. चित्रा नगरकर, श्री. सुधीर भोसले, डॉ. गोविंद कुलकर्णी, शाळेच्या प्राचार्या डॉ. सुलभा विधाते, कॅंपस डायरेक्टर सौ. गीतांजली बोधनकर, उपप्राचार्य श्री. अनंत कुलकर्णी, पर्यवेक्षक श्री. श्याम नांगरे, श्री. संदीप पवार हे उपस्थित होते, याप्रसंगी इयत्ता १० वी व १२ वी च्या गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार व रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त स्मरणिकेचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांचे हस्ते झाले, प्रमुख अतिथी सुचेता भिडे- चापेकर यांनी जीवनात कलेचे महत्व खूप असल्याचे सांगितले तर जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. महादेव कसगावडे यांनी या शाळेत अभ्यासाबरोबरच खेळाला खूप महत्त्व दिले जाते याविषयी अभिनंदन केले व जीवनात एका तरी खेळात प्राविण्य मिळवून यशस्वी होण्याचा सल्ला दिला, अध्यक्षीय मनोगतात एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले यांनी सशस्त्र सेनेमध्ये आज महिलांना खूप संधी असल्याचे सांगितले, रौप्यमहोत्सवी सांगता समारंभाच्या निमित्ताने म. ए. सो परफार्मिंग आर्ट्स च्या कलाकारांनी  ‘अनामवीरा’ हा क्रांतिकारकांना मानवंदना देण्याचा देशभक्ती पर कार्यक्रम सादर केला, कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अतिथी परिचय  प्राचार्या डॉ. सुलभा विधाते यांनी करून दिला. पारितोषिक वाचन सौ. रेखा रायपूरकर व सौ. सावित्री पाटील यांनी केले, सूत्रसंचालन उपप्राचार्य श्री. अनंत कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक श्री. श्याम नांगरे यांनी केले, शाळेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त स्मरणिकेचे कामकाज पर्यवेक्षक श्री. संदीप पवार, श्री. गजानन पाटील व समितीने केले तर वर्षभरात विविध कार्यक्रमांचे नियोजन समन्वयक श्री. अद्वैत जगधने व सौ. रेखा रायपूरकर यांनी केले होते.

दिनांक : २१ जून २०२२ रोजी जागतिक योगदिन प्रशालेत उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून  रोप मल्लखांब व कुस्तीची राष्ट्रीय खेळाडू कु. जान्हवी डिंबळे यांनी विद्यार्थिंनींना योग दिनाचे महत्व सांगितले  व  योगासनाचे प्रात्याक्षिक  करून दाखविले. या प्रसंगी राज्यस्तरीय योगासन खेळाडू कु. अक्षता धर्मे हिचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय मनोगतात प्रशालेच्या प्राचार्या डॉ. सुलभा विधाते यांनी उत्तम आरोग्यासाठी नियमित व्यायाम व योगासने  करावीत असा संदेश दिला. या कार्यक्रमात प्रशालेतील सर्व विद्यार्थिंनी, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी व सैनिकी परिवाराने उत्साहात सहभाग घेतला.

 

 

     

 

झॅांसीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रशालेतील राणी लक्ष्मीबाई पुतळयाला हार घातला तसेच घोष पथकाच्या धून वर मानवंदना देण्यात आली. या प्रसंगी प्रशालेतील शिक्षक श्री. प्रशांत जोशी सर यांनी राणी लक्ष्मीबाईचे चरित्र उलगडून दाखवले. या प्रसंगी सर्व सैनिकी परिवार मानवंदनेसाठी उपस्थित होता.

 

 

झॅांसीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त बालगंधर्व चौक येथील राणी लक्ष्मीबाई पुतळयाला महाराष्ट्र एज्यूकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेकडून मानवंदना देण्यात आली. या प्रसंगी शाळेच्या प्राचार्या डॅा.सुलभा विधाते,सैन्य निदेशक श्री.गजानन माळीसर, प्रा.प्रमोद झुरमुरे सर, शाळेचा स्टाफ तसेच सैनिकी शाळेच्या कॅडेट्सचा प्लाटून व बॅंडपथक उपस्थित होते. राणी लक्ष्मीबाईंच्या पुतळयाला प्राचार्या डॅा.सुलभा विधाते,सैन्य निदेशक गजानन माळीसर व स्कूल कॅप्टन सई धोंड यांनी हार घातला. शाळेच्या प्लाटूनने बॅंडच्या तालावर शानदार सलामी दिली. बॅंडपथकाने यावेळी वेगवेगळ्या धून सादर केल्या व उपस्थितांची मने जिंकून घेतली. यावेळी कॅडेटसनी राणी लक्ष्मीबाईंच्या नावाचा जयजयकार करत परिसर दणाणून सोडला.

                 

झॅांसीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त बालगंधर्व चौक येथील राणी लक्ष्मीबाई पुतळयाला महाराष्ट्र एज्यूकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेकडून मानवंदना देण्यात आली. या प्रसंगी शाळेच्या प्राचार्या डॅा. सुलभा विधाते, सैन्य निदेशक श्री.गजानन माळी सर, प्रा. प्रमोद झुरमुरे सर, शाळेचा स्टाफ तसेच सैनिकी शाळेच्या कॅडेट्सचा प्लाटून व बॅंडपथक उपस्थित होते. राणी लक्ष्मीबाईंच्या पुतळयाला प्राचार्या डॅा. सुलभा विधाते, सैन्य निदेशक गजानन माळीसर व स्कूल कॅप्टन सई धोंड यांनी हार घातला. शाळेच्या प्लाटूनने बॅंडच्या तालावर शानदार सलामी दिली. बॅंडपथकाने यावेळी वेगवेगळ्या धून सादर केल्या व उपस्थितांची मने जिंकून घेतली. यावेळी कॅडेटसनी राणी लक्ष्मीबाईंच्या नावाचा जयजयकार करत परिसर दणाणून सोडला.

आनंद वार्ता,

*कॅडेट गीता गणपत धनवडे, इयत्ता :- आठवी (ब)* हिचा प्रोजेक्ट महाराष्ट्रातील सर्वात मोठे *राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये तृतीय क्रमांक* पटकावून विजेता झाला आहे. सन्मानचिन्ह, सर्टिफिकेट, पाच हजार रुपये रोख आणि एक वर्षासाठी सायन्स सेंटर, बारामती येथील मेंबरशिप कार्ड, असे बक्षीस या प्रोजेक्टसाठी देण्यात आले. तसेच पद्मविभूषण थोर शास्त्रज्ञ डॉ.अनिल काकोडकर यांच्या सह प्रख्यात शास्त्रज्ञांशी संवाद साधण्यात आला.
कॅडेट गीता गणपत धनवडे हिचा सत्कार, ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीचे अध्यक्ष श्री. राजेंद्र पवार सर यांनी केला आणि पुढील संशोधनासाठी शुभेच्छा दिल्या.

राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजक :-
1. महाराष्ट्र शासनाचे – राजीव गांधी सायन्स अँड इंनोवेशन ऍक्टिव्हिटी सेंटर, बारामती.
2. नेहरू सायन्स सेंटर, मुंबई.
3. ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती.
4. टाटा ट्रस्ट, मुंबई

आयोजन दिनांक :- 15 ते 17 जून 2022.

ठिकाण :- कृषी विज्ञान केंद्र, शारदानगर, बारामती

नेहरू सायन्स सेंटरचे चेअरमन श्री. अरविंद परांजपे सर कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

हिमाचल प्रदेश मनाली येथील अटलबिहारी वाजपेयी माऊंटेनेरिंग इन्स्टिट्यूट मध्ये आपल्या सैनिकी शाळेतील इयत्ता 8 वी व 9 वी च्या विद्यार्थिनींनी दिनांक 19 मे ते 5 जून 2022 या कालावधीत अॅडव्हेंचर कोर्स पूर्ण केला,यात राॅक क्लाइंबिंग,जुमारिंग,रॅपलिंग , रिव्हर क्रॉसिंग,वाॅल क्लाइंबिंग,हाइट गेनिंग व एकाच दिवशी सल़ग 14 किलो मीटर चालणे हे उपक्रम केले ,रोहतांग पास व अटल टनेल या ऐतिहासिक क्षेत्राला भेट दिली, 95 पैकी 95 मुलींना ” A ” ग्रेड मिळाली हे विशेष होय.संघ व्यवस्थापक म्हणून आॅनररी कॅप्टन ( निवृत्त) श्री.चंद्रकांत बनसोडे , पर्यवेक्षक व हिंदी व क्रीडा विभाग प्रमुख श्री.संदीप पवार यांच्या नेतृत्वाखाली सौ.अश्विनी पवार , श्री.महादेव मगर , कु. प्रियांका हजारे , कु.श्रेया देशपांडे , श्रीमती प्रियांका हजारे व श्रीमती मनाली लाडे यांनी कामकाज पाहिले.

म.ए.सो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा, कासार आंबोली, ता. मुळशी येथे पासिंग आऊट परेड व चित्तथरारक सैनिकी प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम उत्साहात पार पडला . या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. सुहास दिवसे ,आयुक्त , महानगर विकास प्राधिकरण , सी.ए.श्री.योगेश दीक्षित कार्यक्रमाचे व संस्थेचे अध्यक्ष एअर मार्शल भूषणजी गोखले ( निवृत्त) संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्किटेक्ट श्री राजीवजी सहस्त्रबुद्धे ,नियामक मंडळ सदस्या व शालासमिती अध्यक्षा डॉ.माधवी मेहेंदळे , सदस्य श्री.बाबासाहेब शिंदे , अॅड. श्री.सागर नेवसे ,संस्थेचे सचिव श्री भरत व्हनकटे ,सहाय्यक सचिव श्री सुधीर गाडे,शालासमिती महामात्रा ,प्रा.चित्रा नगरकर ,प्रा.सुधीर भोसले ,प्रा.शैलेश आपटे , शाळेच्या प्राचार्या डॉ.सुलभा विधाते यांच्या उपस्थितीत झाला , शानदार संचलनानंतर इयत्ता १२ वी ची पासिंग आऊट परेड झाली ,त्यानंतर प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम झाला ,यात लेझिम,योगासन, मर्दानी खेळ,रोप मल्लखांब, धनुर्विद्या ,रायफल शुटिंग,हाॅर्स रायडिंग व कराटे यांचा समावेश होता, याप्रसंगी” टाकाऊतून टिकाऊ “या संकल्पनेनुसार विमान शिल्प ,एन.सी.सी कक्ष व आर्ट वाॅल चे उद्घघाटन ही प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते झाले, Sword Of Honour हा पुरस्कार कु.वृंदा पवार व उत्कृष्ट विद्यार्थिनी हा पुरस्कार साक्षी टेकवडे हिला मिळाला , उत्कृष्ट प्रात्यक्षिक सादरीकरणाचा पुरस्कार रायफल शुटिंग ला मिळाला मार्गदर्शन आॅनररी कॅप्टन (निवृत्त) श्री.चंद्रकांत बनसोडे यांनी केले राष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थिनी कु.देवयानी चव्हाण,गीता धनवडे व गिरिजा जोगळेकर तसेच शाळेला मदत करणारे चित्रकार श्री.विक्रम कुलकर्णी, शिल्पकार श्री.रोहन चंद्रचूड, वेल्डर श्री.सुनिल लोहार तसेच शैक्षणिक योगदानाबद्दल शाळेचे उप मुख्याध्यापक श्री अनंत कुलकर्णी ,सौ.मंजिरी पाटील , श्री.रविंद्र उराडे ,सौ.वैशाली शिंदे या शिक्षकांना ही सन्मानित करण्यात आले.या प्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ.सुहास दिवसे यांनी पासिंग आऊट परेड व मुलींची चित्तथरारक प्रात्यक्षिके पाहून भारावून गेल्याचे सांगितले तर अध्यक्षीय मनोगतात एअर मार्शल श्री.भूषणजी गोखले (निवृत्त ) यांनी कोरोनाच्या आपत्तीनंतर प्रात्यक्षिकांचे सुंदर सादरीकरण केल्याबद्दल सर्व विद्यार्थिनींचे व शिक्षकांचे ही कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.माधवी मेहेंदळे , सूत्रसंचालन श्री.अद्वैत जगधने यांनी केले तर उपमुख्याध्यापक श्री.अनंत कुलकर्णी यांनी आभार मानले.कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्या डॉ.सुलभा विधाते यांच्या मार्गदर्शनानुसार क्रीडा विभाग प्रमुख व पर्यवेक्षक श्री.संदीप पवार व सैन्यप्रशिक्षण विभागप्रमुख हवालदार श्री.गजानन माळी व सर्व सैनिकी परिवार यांनी केले.

 

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई  मुलींची सौनिकी शाळेतील राष्ट्रीय छात्र सेनेच्या म्हणजेच एन.सी.सी. – एअर विंगच्या ५ छात्रांनी शनिवार, दि. १२ मार्च २०२२ रोजी मायक्रोलाईट – एसडब्ल्यू ८० या आकाश भरारीचा चित्तथरारक अनुभव घेतला.
देशाच्या स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी आणि मएसो राणी लक्ष्मीबाई सैनिकी शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षात या पंचाकन्यांना मिळालेली आकाश भरारीची संधी ही लक्षणीय बाब आहे.
शाळेत इ. ९ वी मध्ये शिकणाऱ्या वैष्णवी जयराम धावडे, विजेता विशाल दुर्गे,  समृध्दी बालाजी रायबन, इरा जयंत खाडिलकर आणि भार्गवी आनंद शिंदे या छात्रांची पुणेस्थित ३ महाराष्ट्र एअर स्क्वाड्रनतर्फे एन.सी.सी. – एअर विंगच्या फ्लाईंग अॅक्टिव्हिटीसाठी निवड करण्यात आली होती. प्रत्येक छात्राला मायक्रोलाईट – एसडब्ल्यू ८० या विमानाच्या सह-वैमानिकाच्या भूमिकेतून १० ते १५ मिनिटे हवाई उड्डाणाची संधी मिळाली. त्यासाठी ३ महाराष्ट्र एअर स्क्वाड्रनचे कमांडिंग ऑफिसर ग्रुप कॅप्टन रमेश जाधव यांनी प्रशिक्षण व विशेष सहकार्य केले.
शाळेतील एनसीसीच्या सी.टी.ओ. राजश्री गोफणे यांनी या छात्रांना मार्गदर्शन केले.
मायक्रोलाईट – एसडब्ल्यू ८० या विमानाला एकच इंजिन असून त्यात वैमानिक आणि सह-वैमानिकांसाठी आसन व्यवस्था आहे. कोणत्याही मोठ्या विमानाच्या उड्डाणापूर्वी धावपट्टीच्या आसपास उडणाऱ्या पक्षांना बाजूला करण्यासाठी या विमानाचा वापर केला जातो.

प्रशालेच्या रौप्यमहोत्सवी वर्षाप्रित्यर्थ राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन सैनिकी शाळेतर्फे करण्यात आले.
१) दि.१० ते १७ फेब्रुवारी दरम्यान विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, भारत सरकार यांच्यातर्फे आयोजित ‘विज्ञान सर्वत्र पूज्यते या उपक्रमाअंतर्गत घेण्यात आलेल्या ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धेत इ.६ वी ते ९ वी च्या ३८ विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला. सर्व सहभागी विद्यार्थिनींना विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, भारत सरकार यांचेतर्फे E certificate मिळाले.
२) दि.२५,२६,२८ फेब्रुवारी दरम्यान शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे आयोजित इ.६ वी ते ९ वी व ११ वी च्या विद्यार्थिनींसाठी निबंध, वैज्ञानिक रांगोळी, वक्तृत्व – व्हिडीओ स्पर्धा घेण्यात आल्या. निवडक स्पर्धकांचे व्हिडिओ SCERT website वर upload करण्यात येतील.प्रत्येक स्पर्धेत तीन क्रमांक काढण्यात आले.
३) दि.२६ फेब्रुवारी रोजी म.ए.सो.मधील सर्व प्राथमिक व माध्यमिक विभागातील विज्ञान अध्यापकांसाठी Creative learning in Science या ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.ही कार्यशाळा IIT Gandhinagar centre for creative learning मधील तज्ञ मार्गदर्शक श्री.जय ठक्कर यांनी घेतली.
४) दि.२ मार्च रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला. Geology विषयाचे शास्त्रज्ञ मा.डॉ. विद्याधर बोरकर प्रमुख अतिथी होते. जीवाश्म (Fossils) या विषयावर त्यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.IUCAA Science outreach program चे.श्री.रुपेश लबडे यांनी *खेळणी* *द्वारे विज्ञान शिक्षण याविषयी* सत्र घेतले.या सत्रात विविध सहज उपलब्ध साहित्याचा वापर करून विद्यार्थिनींनी गटामध्ये उपकरणे, मॉडेल्स  देखील तयार केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.डॉ.दत्तात्रय नाईक – प्रकल्प समन्वयक, म.ए.सो.यांनी देखील विज्ञानातील संशोधन याविषयी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. विविध स्पर्धेत प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थिनींचे कौतुक अतिथींच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन करण्यात आले.

म.ए.सो. च्या १६० वर्षाच्या ‘ध्यासपंथे चालता’ या इतिहास ग्रंथाच्या प्रकाशनासाठी मा. उपराष्ट्रपती यांनी मंगळवार दि. ८ फेब्रुवारी २०२२,  सायंकाळी ४ वा.  फेसबुक आणि यू ट्यूब या ऑनलाईन माध्यमांद्वारे या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

 

प्रशालेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त, प्रजासत्ताक दिनी प्रशालेतील पदाधिकारी, शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे देशभक्तीपर गीत गायन….

Zee .T.V हिंदी ‘ सा रे ग म पा’ या अत्यंत लोकप्रिय कार्यक्रमात महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेतील विद्यार्थिनींनी प्रात्यक्षिके सादर केली , सदर कार्यक्रमाचे परीक्षण सुप्रसिद्ध गायक श्री. शंकर महादेवन, श्री.हिमेश रेशमिया व सुप्रसिद्ध सिनेअभिनेते श्री. विवेक ओबेराॅय होते. कार्यक्रम बघून सर्व सहभागी स्पर्धक व प्रेक्षक ही भारावून गेले होते. शनिवार दिनांक 22 जानेवारी 2022 रोजी हा संपूर्ण कार्यक्रम रात्री 9.00 वाजता ZEE (Hindi) T.V वर दाखविण्यात आला.🙏🙏🙏

https://youtu.be/ste8pGAau-o

                             

संवाद वीरांगनेशी- भाग 4
रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त, 15 दिवसांच्या कार्यक्रमा अंतर्गत,आपल्या प्रशालेची माजी विद्यार्थिनी फ्लाइंग ऑफिसर दामिनी देशमुख यांनी सोमवार दि.13.12.21 रोजी दुपारी 12.00 वाजता प्रशालेतील विद्यार्थिनींशी संवाद साधला.
एअर फोर्स मधील संधी, SSB Interview, medical test, national merit list याविषयी माहिती सांगितली.
एअर फोर्स मध्ये निवड होताना आलेले अपयश आणि त्यावर मात करून मिळवलेले यश याविषयी अनुभव सांगितले.
विद्यार्थिनींना ‘स्वतःला ओळखा आणि स्वतःशी प्रामाणिक राहून आपले करिअर निवडा, तसेच आर्मी, नेव्ही, एअर फोर्स मधील करिअर ज्ञानाबरोबरच आपल्या व्यक्तिमत्वाशी जास्त निगडीत आहे. प्रशालेतील जास्तीत जास्त उपक्रमात सहभागी होऊन व्यक्तिमत्व घडवा.’ असा मोलाचा सल्ला दिला. त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली.
याप्रसंगी फ्लाइंग ऑफिसर दामिनी देशमुख व सौ. संस्कृती खैरनार-पाटील आणि त्यांच्या बॅचमधील विद्यार्थिनी यांनी प्रशालेतील रसायनशास्त्राच्या शिक्षिका रुपाली लडकत यांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रशालेस 105 पुस्तके भेट दिली.
हा कार्यक्रम इ. 12 वी च्या विद्यार्थिनींनी सादर केला. अध्यक्षीय मनोगत प्रशालेच्या प्राचार्या डॉ. सुलभा विधाते यांनी केले. अशा अनेक दामिनी या प्रशालेत घडाव्यात अशी इच्छा व्यक्त केली. उपप्राचार्य श्री. अनंत कुलकर्णी, पर्यवेक्षक श्री. श्याम नांगरे, पर्यवेक्षक श्री. संदीप पवार, सर्व शिक्षकवृंद, सैनिकी परिवार सर्वांनाच अशा विद्यार्थिनी आपल्या शाळेतून घडत आहेत याचा आनंद झाला. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन सौ. सावित्री पाटील यांनी केले.

Scroll to Top
Skip to content