सैनिकी विरांगणांनी केला भारतीय वायूसेना दिवस उत्साहात साजरा….

म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा, कासार अंबोली, पुणे येथे ९ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रशालेतील एअर एन.सी.सी. कॅडेट्स यांच्याकडून ९१ वा भारतीय वायुसेना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. प्रशालेतील मैदानावर सकाळी ६ .१५ वा. भारतीय वायुसेना दिनानिमित्त एअर एन.सी.सी. ने उत्कृष्ट संचलन केले. आणि दि. १० ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ७.४० वा. प्रशालेतील बहुउद्देशीय सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमात कॅडेट्सनी भारतीय वायुसेनेची व त्यातील एयरक्राफ्ट्स ची माहिती व इतिहास सांगितला. तसेच Commbined Annual Training Camp -७१६ चा अनुभव सांगितला आणि उपक्रमांचे फोटो आणि व्हिडीओ दाखवण्यात आले. त्याचबरोबर भारतीय वायुसेनेचा प्रोत्साहनात्मक व्हिडीओ आणि एअर शो दाखवण्यात आला.
उपमुख्याध्यापक श्री.अनंत कुलकर्णी सर यांनी सर्व कॅडेट्सना भारतीय वायुसेने मधील विविध संधी व त्यासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी या सगळ्याबद्दल मार्गदर्शन केले. आणि सध्या सुरु असलेल्या इस्राईल आणि पॅलेस्टाईन युद्धाच्या स्थितीची माहिती दिली.
एन.सी.सी. विभाग प्रमुख थर्ड ऑफिसर राजश्री गोफणे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले आणि कॅडेट्सना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास सर्व पदाधिकारी, सैन्य प्रशिक्षण विभाग, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

‘एक तारीख एक तास’ श्रमदान या उपक्रमांतर्गत सैनिकी शाळेच्या वीरांगणाचे स्वच्छता अभियान….
दिनांक 01 ऑक्टोबर 2023 रविवार रोजी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेतील सर्व विद्यार्थिनींनी शालेय परिसरात स्वच्छता केली. सहावी आणि दहावीच्या विद्यार्थिनींनी कासार आंबोली गावातील पद्मावती मंदिर, विठ्ठल मंदिर परिसर व जिल्हा परिषद शाळा परिसर स्वच्छ केला. यावेळी स्वच्छतेविषयी असलेल्या जनजागृती विषयक घोषणा देण्यात आल्या व घोषवाक्य दर्शविण्यात आली.या निमित्ताने स्वच्छतेविषयी विद्यार्थिनींनी गावात जनजागृती केली व स्वच्छतेचा मंत्र दिला व स्वच्छतेची शपथ दिली. गावकरी व नागरिक आपण राहत असलेला परिसर स्वच्छ ठेवतील अशी अपेक्षा व्यक्त केली. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा ही कासार-अंबोली या गावातच असल्याने व पद्मावती मंदिर हे ग्रामदैवत असल्याने हा परिसर स्वच्छतेसाठी निवडला होता. प्रशालेत शिकत असलेल्या विद्यार्थीनी बहुतांश शहरी भागातल्या आहेत. या उपक्रमामुळे त्यांना ग्रामीण जीवनाची ओळख झाली. या कार्यक्रमासाठी कासार आंबोलीचे सरपंच श्री.उमेश सुतार माजी सरपंच श्री.सचिन धुमाळ , सर्व ग्रामपंचायत सदस्य, विस्तार अधिकारी श्री.निकम साहेब, ग्रामविकास अधिकारी श्री.क्षीरसागर भाऊसाहेब,आशासेविका सौ.आशाताई लांडगे, सैनिकी शाळेच्या कॅम्पस डायरेक्टर सौ.गितांजली बोधनकर, पर्यवेक्षक श्री.संदीप पवार, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन सैनिकी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुवर्णा कांबळे, उपमुख्याध्यापक श्री. अनंत कुलकर्णी, पर्यवेक्षक श्री. श्याम नांगरे यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले .

सैनिकी शाळेत गणेशोत्सव उत्साहात साजरा
दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील प्रशालेच्या दीड दिवसाच्या गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. आनंदात व मोठ्या जल्लोषात गणेश उत्सवाची सुरुवात झाली. प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या प्रकारच्या देखाव्याची आरास तयार करण्यात येते, यावर्षी देखील प्राचीन गुहा तसेच प्राचीन वस्तू व वास्तू यांच्या देखावाच्या माध्यमातून दाखविण्याचा प्रयत्न इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींनी केला. प्राचीन गोष्टीचे जतन व संवर्धन करणे हा या देखावा मागचा हेतू होता. आधुनिक काळात जगत असताना आपली संस्कृती कशी जपावी हा विद्यार्थिनींना देखावाच्या माध्यमातून दिलेला संदेश होता.
सदर गणेशोत्सवाची नियोजनाची व तयारीची जबाबदारी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनीकडे देण्यात आली होती. विद्यार्थिनींनी उपलब्ध असलेल्या साहित्याचा तसेच वर्तमानपत्राचा रद्दीचा लगदा तयार करून गुहा तयार केली आणि लेण्यांची भिंतीचित्र यांचे प्रदर्शन भरविले होते.
पहिल्या दिवशी श्रीची प्रतिष्ठापना परंपरेप्रमाणे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थिनी इयत्ता नववीतील कॅडेट मुक्ती पटेल व कॅडेट आर्या निपसे यांचा हस्ते झाली. सायंकाळी खेळ व नृत्य या करमणुकीच्या कार्यक्रमाचे विद्यार्थिनींनी नियोजन करून उत्तमरीत्या सादर केला.
दुसऱ्या दिवशी पालक शिक्षक संघाचे प्रतिनिधींच्या उपस्थितीत गणपतीची आरती करून विसर्जन मिरवणूक द्वारे दीड दिवसाचा गणपतीची सांगता झाली.
सदर गणेशोत्सव नियोजन व यशस्वीरित्या होण्यासाठी प्रशालेचे पदाधिकारी कॅम्पस डायरेक्टर सौ. गीतांजली बोधनकर, प्रशालेच्या प्राचार्या सौ. सुवर्णा कांबळे, उपमुख्याध्यापक श्री. अनंत कुलकर्णी, पर्यवेक्षक श्री. श्याम नांगरे, श्री. संदीप पवार, इयत्ता दहावीचे वर्गशिक्षक व इतर सर्व कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोजी म. ए. सो.राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा कासार आंबोली येथे राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्त शाळेतील विद्यार्थिनींचे रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन केले होते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शाळेच्या कॅम्पस डायरेक्टर सौ. गीतांजली बोधनकर यांनी क्रीडा दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. अध्यक्षीय मनोगत शाळेचे उपमुख्यद्यापक श्री. अनंत कुलकर्णी यांनी उत्तम आरोग्यासाठी नियमित व्यायाम खेळ याचे महत्त्व विद्यार्थिनींना सांगितले. याप्रसंगी शाळेचे पर्यवेक्षक श्री. संदीप पवार सैन्य प्रशिक्षक विभाग प्रमुख श्री. गजानन माळी, श्री. बाळासाहेब चव्हाण क्रीडा शिक्षक श्री. महादेव मगर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रशालेचे एकूण 553 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॅडेट वैभवी शिंदे हिने केले, तर आभार प्रदर्शन कॅडेट अक्षयनी माने हिने केले.

म.ए.सो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा कासार आंबोली ता.मुळशी च्या इयत्ता ९ वी च्या ५० विद्यार्थिनी ,शाळेचे पदाधिकारी व शिक्षक यांनी सुतार वाडी येथील आदित्य प्रांगण संस्कार प्रतिष्ठान मधील मतिमंद मुलांच्या शाळेतील दिव्यांग मुलांना राखी बांधून खाऊ वाटप करत सामाजिक बांधिलकी चा संदेश दिला, दिव्यांग बालकांच्या चेह-यावरचा आनंद पाहून व त्यांच्यामध्ये असणाऱ्या विविध क्षमता पाहून सैनिकी शाळेच्या विद्यार्थिनी भारावून गेल्या, या प्रसंगी संस्कार प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष श्री.उल्हास केंजळे, मुख्याध्यापक श्री.मच्छिंद्र जाधव, सैनिकी शाळेच्या कॅंपस डायरेक्टर सौ.गीतांजली बोधनकर, उपमुख्याध्यापक श्री.अनंत कुलकर्णी, पर्यवेक्षक श्री.संदीप पवार, सौ.मंजिरी पाटील, श्री.महेश कोतकर, श्री.प्रमोद झुरमुरे, श्री.भाऊसाहेब मार्तंड हे शिक्षक उपस्थित होते. या प्रसंगी ज्येष्ठ शिक्षक श्री. भाऊसाहेब मार्तंड व काही दिव्यांग विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते गाऊन सर्वांची मने जिंकली, या कार्यक्रमाचे नियोजन सैनिकी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुवर्णा कांबळे यांच्या मार्गदर्शनानुसार शिक्षकांनी केले होते.

लक्ष्य फाऊंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘कारगिल विजय रजत महोत्सवा’च्या निमित्ताने घेण्यात आलेल्या ‘पोस्टर मेकिंग कॉम्पिटिशन’मध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेतील कॅ. सिया बच्छाव, कॅ. साक्षी बोंडगे, कॅ. गायत्री जोशी या छात्रांनी बनविलेल्या पोस्टरला प्रथम क्रमांक देऊन गौरवण्यात आले.

या कार्यक्रमात लक्ष्य फाऊंडेशनच्या संस्थापिका सौ. अनुराधा प्रभूदेसाई व अन्य मान्यवरांच्या अनुभव कथनातून प्रत्यक्ष कारगिल युद्धाचा थरार विद्यार्थ्यांना अनुभवायला मिळाला. पुण्यातील विविध शाळांमधील सुमारे साडेतीन हजार विद्यार्थी या वेळी उपस्थित होते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेतील १०४ छात्रांचा त्यामध्ये समावेश होता.

बुधवार दि. २६ जुलै २०२३ रोजी प्रशालेमध्ये दुपारी ३.०० ते ४.०० या वेळेमध्ये १२ वी च्या सिनियर कॅडेट्स यांनी कारगिल डे / विजय दिवस या सुंदर कार्यक्रमाचे नियोजन केले होते. सूत्रसंचालनासोबतच बासरी वादन, नृत्य, देश भक्तीपर गीत व नाटिका या माध्यमातून कॅडेट्स यांनी आपली देश प्रेमाची भावना व्यक्त केली. सदर कार्यक्रम सैन्य प्रशिक्षण विभागातर्फे सादर करण्यात आला. कार्यक्रमानंतर पाऊस खूप असल्याने कॅडेट्सना LOC कारगिल चित्रपट दाखविण्यात आला कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सैन्य प्रशिक्षण विभागाचे हवालदार गजानन माळी व बाळासाहेब चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी सैनिकी परिवार उपस्थित होता.

म. ए. सो. अटल टिंकरिंग लॅब समिती द्वारे संस्थेच्या अटल टिंकरिंग लॅब असणाऱ्या शाळांमधील विज्ञान व सामाजिक शास्त्र शिकवणाऱ्या विषय शिक्षकांसाठी कार्यशाळेचे आयोजन शनिवार दिनांक २२ जुलै २०२३ रोजी बाल शिक्षण मंदिर इंग्रजी माध्यम प्रशाला मयूर कॉलनी, कोथरूड येथे करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी म. ए. सो. च्या बाल शिक्षण मंदिर इंग्रजी माध्यम प्रशाला, शिरवळ इंग्रजी माध्यम प्रशाला, वाघीरे विद्यालय, सासवड, रेणाविकर विद्यालय, नगर व सैनिकी शाळेतील निवडक अध्यापकांनी सहभाग नोंदवला.

कार्यशाळेचे उदघाटन संस्थेच्या नियामक मंडळाच्या उपाध्यक्षा मा. आनंदीताई पाटील यांच्या हस्ते झाले, याप्रसंगी म. ए. सो. चे सहसचिव मा. श्री. सुधीरजी गाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. सचिनजी आंबर्डेकर, नियामक मंडळ सदस्य व म.ए.सो. अटल टिंकरिंग लॅब समिती अध्यक्ष मा. श्री. विजयजी भालेराव व म . ए. सो. अटल टिंकरिंग लॅब समिती समन्व्यक मा.डॉ. दत्तात्रय नाईक व मा. डॉ. नेहा देशपांडे उपस्थित होते.सर्व मान्यवरानी अटल लॅब बाबत शाळांची भूमिका, कार्यवाही व अपेक्षित कार्यस्वरूप याबाबत प्रशिक्षणार्थिंनींना मार्गदर्शन केले. कार्यशाळेत रोबोकार्ट टेकनॉलॉजिज चे तज्ञ प्रशिक्षकांनी Arduino coding, Agri tech kit Digital &analog signals, Tinkercad व Remote XY अँप याबाबत प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले. सर्व शाळांमधील सहभागी प्रशिक्षणार्थिनींनी आपल्या शाळेत उपलब्ध असणाऱ्या किट्सचा / साहित्याचा वापर करून विविध prototype तयारी केले व गटानुसार तयार केलेल्या prototype चा उपयोग, प्रकल्प नाव इ. बाबत सादरीकरण केले. या कार्यशाळेत प्रशालेतील ATL इन्चार्ज श्री. अनंत कुलकर्णी, विज्ञान विभाग प्रमुख सौ.मंजिरी पाटील, अटल समिती सदस्य सौ. सावित्री पाटील, श्री. प्रमोद झुरमुरे, श्री. रवींद्र उराडे व सामाजिक शास्त्र विषय शिक्षक श्री. गजानन पाटील उपस्थित होते. Soil moisture sensor coding, Arduino connections व programming, यावर आधारित समजोपयोगी प्रकल्प याबाबत सादरीकरण प्रशालेच्या सहभागी शिक्षकांनी केलेकार्यशाळेचे नियोजन सैनिकी शाळा तर संयोजन बाल शिक्षण मंदिर इंग्रजी माध्यम प्रशालेने केले.

दि. १७ जुलै २०२३ रोजी प्रशालेमध्ये परिपाठ वेळेत दीप अमावस्या साजरी करण्यात आली. या प्रसंगी प्रशालेचे अध्यापक श्री. महेश कोतकर यांनी या दिनाचे महत्व विद्यार्थिनींना समजाऊन सांगितले.

तसेच प्रशालेच्या वसतिगृहात देखील दीप अमावस्या साजरी केली गेली. वसतिगृहात दिव्यांची पूजा करण्यात आली. वर्ग ६ च्या सर्व मुली, कॅप्टन, मेट्रन, मेट्रन ईंचार्ज श्रीम. गुरव मॅडम व श्रीम. मेहता उपस्थित होत्या. सर्वांनी प्रार्थना म्हटली. स्कूल कॅप्टन मुग्धा ने दीप अमावस्या बद्दल माहिती सांगितली. मुलींनी त्यांच्या घरी होणाऱ्या पूजनाची माहिती दिली.

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील पहिली पालक सभा रविवार, दिनांक १६ जुलै २०२३ रोजी पार पडली. या पालकसभेत शिक्षक पालक संघाचे पालक प्रतिनिधींची निवड करण्यात आली. तसेच मातापालक संघाचे माता सदस्या देखील निवडण्यात आल्या. प्रशालेतील झालेले उपक्रम, नियोजित उपक्रम, स्पर्धा परीक्षांचे आयोजन, शाळेची नियमावली याबाबत सर्व वर्गशिक्षकांनी पालकांना संबोधित केले तसेच प्रशालेच्या पदाधिऱ्यांनी देखील पालकाना मार्गदर्शन केले.

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी – या परीक्षेचा निकाल दिनांक २९ एप्रिल २०२२ रोजी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत पाच विद्यार्थ्यांनी पात्र झाल्या आहेत. पात्र विद्यार्थिनींची नावे पुढील प्रमाणे –
१) मुक्ती ईश्वर पटेल = 222 / 300
२) आर्या अमित निपसे = 188 /300
३) गिरिजा हेमंत जोगळेकर = 170 / 300
४) जानवी रुपेश गायकवाड = 156 / 300
५) श्रावणी विलास नलावडे = 150 / 300

ग्रामीण गुणवत्ता यादीमध्ये २ विद्यार्थिनींची निवड झाली आहे.
१) आर्या अमित निपसे
२) मुक्ती ईश्वर पटेल

सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन. तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे व पदाधिकारी या सर्वांचे अभिनंदन.

570 cadets of our school witnessed launching of chandrayaan… Live streaming… A very exciting moment for us.

दिनांक १४ जुलै २०२३ रोजी इयत्ता नववीच्या मुलींना मनाली येथे झालेल्या ऍडव्हेंचर कोर्स चे सर्टिफिकेट सकाळी परिपाठा दरम्यान देण्यात आले. सदर कोर्स २० एप्रिल २०२३ ते ३ मे २०२३ या कालावधीत अटल बिहारी वाजपेयी माउंटेनरिंग इन्स्टिट्यूट अँड अलाईट स्पोर्ट्स, मनाली येथे ७० कॅडेट्सनी पूर्ण केला, यामध्ये मुलींनी रॉक क्लाइंबिंग, रॅपलिंग, जुमारिंग, रिव्हर क्रॉसिंग, ट्रेकिंग, दहा हजार फूट हाईट गेनिंग इत्यादी ऍक्टिव्हिटी केल्या. या हा ट्रेक सर्व मुलींनी ‘ए’ ग्रेड मध्ये पूर्ण केला. ट्रेकचे नेतृत्व सैन्य विभाग प्रमुख एक्स हवालदार गजानन माळी यांनी केले. कॅम्पस डायरेक्टर श्रीमती गीतांजली बोधनकर, प्राचार्या सौ. सुवर्णा कांबळे, उपप्राचार्य श्री. अनंत कुलकर्णी आणि पर्यवेक्षक श्री. श्याम नांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली या ट्रेकचे आयोजन केले होते. ट्रेक मध्ये एक्स हवालदार बाळासाहेब चव्हाण वर्गशिक्षक श्री. भाऊसाहेब मार्तंड सौ. सुनीता शिंदे व मेट्रन मेघा मावशी व अंजनाताई यांची महत्त्वाची कामगिरी होती.

दि. ११ जुलै २०२३ रोजी परिपाठात जागतिक लोकसंख्या दिन या विषयी प्रशालेचे अध्यापक, भूगोल विभाग प्रमुख श्री. अद्वैत जगधने यांनी माहिती सांगितली. मानवाची उत्पत्ती, प्रजाती, राहणीमान आणि मानवाची उत्क्रांती या विषयी सरांनी मोलाची माहिती विद्यार्थिनींस सांगितली. लोकसंख्या आपत्ती कि संपत्ती या विषयी सरांनी आपली भूमिका मांडली.

आपल्या प्रशालेची विद्यार्थिनी कॅडेट गीता गणपत धनवडे, इयत्ता नववी (ब) हिची एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स (Asia Book of Records) या आशिया खंडातील अतिशय मानांकित असणाऱ्या पुस्तकामध्ये रेकॉर्डची नोंद झाली आहे. सायन्स विषयामध्ये कॅडेट गीता गणपत धनवडे हिने आशिया खंडामध्ये सर्वात कमी वयात म्हणजेच अकरा वर्षे पाच महिने पाच दिवस या छोट्याशा कालावधीमध्ये केलेल्या वेगवेगळ्या महत्त्वपूर्ण संशोधनाची दखल घेऊन रेकॉर्डची नोंद या पुस्तकात करण्यात आली आहे. कॅडेट गीता गणपत धनवडे हिने आतापर्यंत वेगवेगळ्या संशोधनामध्ये, विभागामध्ये वीस अवॉर्ड्स मिळविले आहेत. यातील पोलिसांसाठी केलेले संशोधन विशेष उल्लेखनीय आहे. वेगवेगळ्या विषयांमध्ये उल्लेखनीय आणि भरीव कार्य करणाऱ्या व्यक्तींची नोंद या पुस्तकामध्ये ठेवली जाते.

तसेच गीताच्या कार्याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड (India Book of Records) मध्ये दखल घेऊन नोंद करण्यात आली आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स या पुस्तकांमध्ये तसेच वेबसाईट वरती आणि सुदर्शन टी.व्ही. वरती सदरील बातमी प्रसारित झाली आहे.

दिनांक 11 जुलै 2023 रोजी शाळेच्या ए.टी.एल. वर्कशॉप या कार्यक्रमांमध्ये डॉ.दत्तात्रय नाईक (महान संशोधक आणि शास्त्रज्ञ) आणि डॉ. नेहा देशपांडे (लाईफ टाईम मेंबर म.ए.सो.) यांचे शुभ हस्ते कॅडेट गीता गणपत धनवडे हिचा शाळेतर्फे सत्कार करण्यात आला.

सदरील प्रोजेक्टसाठी ए.टी.एल. इन्चार्ज आणि उपप्राचार्य श्री. अनंत कुलकर्णी आणि सायन्स विभाग प्रमुख सौ. मंजिरी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. सैनिकी परिवारातर्फे कॅम्पस डायरेक्टर सौ. गीतांजली बोधनकर, प्राचार्या सौ. सुवर्णा कांबळे, उपप्राचार्य श्री. अनंत कुलकर्णी, विज्ञान विभाग प्रमुख सौ. मंजिरी पाटील, पर्यवेक्षक श्री. संदीप पवार आणि श्री. श्याम नांगरे यांनी कॅडेट गीताला शुभेच्छा दिल्या.

कॅडेट गीता गणपत धनवडे हिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा … !!

दिनांक ११ जुलै ते १३ जुलै २०२३ रोजी प्रशालेत अटल कार्यशाळा घेण्यात आली. दिनांक ११ जुलै रोजी बहुउद्देशीय सभागृहात कार्यक्रमाची सुरूवात झाली. प्रमुख अतिथी दत्तात्रय नाईक, नेहा देशपांडे होते रितिक मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा घेण्यात आली. प्रशालेतील विद्यार्थीनींना Electronic components, timer bot, LED sensor, digital scale, traffic light, याच बरोबर coding विषयी मार्गदर्शन करण्यात आले. Arduino वापरून प्रोग्रामिंग द्वारे ट्रॅफिक लाईट चे मोडेल विद्यार्थिनींनी कडून करून घेण्यात आले. या कार्यशाळेमध्ये प्रशालेतील विद्यार्थीनी स्वतः प्रात्यक्षिक करुन इतर विद्यार्थिनींना ही त्याबद्दल माहिती देतील असा उद्देश होता. यावेळी प्रशालेच्या कॅम्पस डायरेक्टर सौ. गीतांजली बोधनकर, प्राचार्या सौ.सुवर्णा कांबळे व उपप्राचार्य श्री. अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शाखाली ही कार्यशाळा घेण्यात आली.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या व्यक्तिमत्व विकास केंद्र पुणे मार्फत दिनांक २७ जून आणि १० जुलै २०२३ रोजी इयत्ता सहावी, सातवी आणि अकरावी करिता नवीन वातावरणाशी जुळवून घेणे आणि त्यातून स्व विकास साधणे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. व्यक्तिमत्व विकास केंद्राच्या मुख्य समन्वयक गिरीजा लिखिते मॅडम त्याचसोबत केंद्राचे तज्ञ प्रशिक्षक स्मिता लोकरे मॅडम, सुरेखा नंदे मॅडम, गायत्री वाणी मॅडम, प्रशालेच्या समुपदेशक सौ पियुषा सामंत आणि सौ श्रेया श्रीगोंदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर सत्र पार पडले.

प्रशालेतील विद्यार्थिनींनी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये काढलेली चित्र आर्टवॉलवर दिनांक ८ जुलै २०२३ रोजी प्रदर्शित करण्यात आली. विद्यार्थिनींच्या चित्रकलेला व्यासपीठ मिळावे यासाठी या आर्टवॉलची निर्मिती करण्यात आली आहे. विद्यार्थिनींना चित्रकलेची प्रेरणा मिळावी म्हणून अधूनमधून निवडक प्रसिद्ध चित्रकारांची चित्रदेखील या आर्टवॉलवर प्रदर्शित करण्यात येतात.

दि. ७ जुलै २०२३ रोजी प्रशालेचा २६ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास प्रशालेच्या शालासामिती अध्यक्षा मा. डॉ. माधवी मेहेंदळे उपस्थित होत्या. प्रशालेच्या निर्मितीपाठी संस्थेची भूमिका सांगून, शाळेतील जास्तीत जास्त मुलींनी येथील विविध सोयी सुविधांचा उपयोग करून घेत आपली प्रगती साकारावी असे उद् गार डॉ. मेहेंदळे यांनी काढले. या प्रसंगी प्रशालेतील कॅडेट्स च्या रँक प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आल्या. या निमित्ताने प्रशालेच्या विद्या दैनंदिनीचे प्रकाशन देखील करण्यात आले.

दि. ४ जुलै २०२३ रोजी पौड, ता. मुळशी येथे शिक्षक आमदार मा. श्री. जयंत आसगावकर यांनी सैनिकी शाळेची ऍथलेटिक्स राष्ट्रीय खेळाडू कॅडेट मुग्धा पाटे हिचा सत्कार केला व शाळेला शिक्षक आमदार निधीतून प्रिंटर भेट दिला, प्रिंटर स्विकारताना पर्यवेक्षक श्री.संदीप पवार राष्ट्रीय खेळाडू कॅडेट मुग्धा पाटे.

दिनांक ३ जुलै २०२३ रोजी शालेय परिपाठात गुरुपौर्णिमा साजरी केली. प्रशालेचे जेष्ठ शिक्षक श्री. अद्वैत जगधने यांनी विद्यार्थिनींना गुरुपौर्णिमेचे महात्म्य पटवून दिले. विद्यार्थिनींनी प्रशालेतील सर्व शिक्षकांना स्वतः तयार केलेले बुकमार्क भेट दिले. कार्यक्रमाचे सर्व संचालन विद्यार्थिनींनीच केले होते. या प्रसंगी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. सुवर्णा कांबळे, कॅम्पस डिरेक्टर सौ. गीतांजली बोधनकर यांनी देखील विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री.अनंत कुलकर्णी, पर्यवेक्षक श्री. श्याम नांगरे, श्री.संदीप पवार आणि सर्व शिक्षक उपस्थित होते.

रविवारी दिनांक २, ९ व २३ जुलै २०२३ रोजी प्रशालेत हॉबी क्लबचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थिनींच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून या उपक्रमाचे आयोजन केले जाते. यात स्कल्पचर, वारली पेंटिंग, रांगोळी, आर्ट अँड क्राफ्ट, ड्रॉईंग, फिल्म क्लब अशा विविध ऍक्टिव्हिटी घेण्यात आल्या. सदर उपक्रम दर रविवारी घेतले जातात. उपक्रम यशस्वी होण्यासाठी हॉस्टेल विभाग यांचे विशेष सहकार्य लाभले. उपक्रमांचे समन्वयक श्री महादेव मगर सर आहेत.

आज बुधवार दि. 26 जुलै 2023, आपल्या प्रशालेमध्ये दुपारी 03.00 ते 04.00 या वेळेमध्ये 12 वी च्या सिनियर कॅडेट्स यांनी कारगिल डे / विजय दिवस या सुंदर कार्यक्रमाचे नियोजन केले होते. सूत्रसंचालना सोबतच बासरी वादन, नृत्य, देश भक्तीपर गीत व नाटिका या माध्यमातून कॅडेट्स यांनी आपली देश प्रेमाची भावना व्यक्त केली. सदर कार्यक्रम सैन्य प्रशिक्षण विभागातर्फे सादर करण्यात आला. कार्यक्रमानंतर पाऊस खूप असल्याने कॅडेट्सना LOC कारगिल चित्रपट दाखविण्यात आला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सैन्य प्रशिक्षण विभागाचे हवालदार गजानन माळी सर व बाळासाहेब चव्हाण सर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी सैनिकी परिवार उपस्थित होता.

म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा, कासार आंबोली, पुणे शाळेची विद्यार्थिनी कॅडेट गीता गणपत धनवडे, इयत्ता :- नववी (ब) हिची एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स (Asia Book of Records) या आशिया खंडातील अतिशय मानांकित असणाऱ्या पुस्तकामध्ये रेकॉर्डची नोंद झाली आहे.

सायन्स विषयामध्ये कॅडेट गीता गणपत धनवडे हिने आशिया खंडामध्ये सर्वात कमी वयात म्हणजेच अकरा वर्षे पाच महिने पाच दिवस या छोट्याशा कालावधीमध्ये केलेल्या वेगवेगळ्या महत्त्वपूर्ण संशोधनाची दखल घेऊन रेकॉर्डची नोंद या पुस्तकात करण्यात आली आहे. कॅडेट गीता गणपत धनवडे हिने आतापर्यंत वेगवेगळ्या संशोधनामध्ये, विभागामध्ये वीस अवॉर्ड्स मिळविले आहेत. यातील पोलिसांसाठी केलेले संशोधन विशेष उल्लेखनीय आहे. वेगवेगळ्या विषयांमध्ये उल्लेखनीय आणि भरीव कार्य करणाऱ्या व्यक्तींची नोंद या पुस्तकामध्ये ठेवली जाते.

तसेच गीताच्या कार्याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड (India Book of Records) मध्ये दखल घेऊन नोंद करण्यात आली आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स या पुस्तकांमध्ये तसेच वेबसाईट वरती आणि सुदर्शन टी.व्ही. वरती सदरील बातमी प्रसारित झाली आहे.

दिनांक 11 जुलै 2023 रोजी शाळेच्या ए.टी.एल. वर्कशॉप या कार्यक्रमांमध्ये डॉ. दत्तात्रय नाईक सर (महान संशोधक आणि शास्त्रज्ञ) आणि डॉ. नेहा देशपांडे (लाईफ टाईम मेंबर म. ए. सो.) यांचे शुभ हस्ते कॅडेट गीता गणपत धनवडे हिचा शाळेतर्फे सत्कार करण्यात आला.

सदरील प्रोजेक्टसाठी ए.टी.एल. इन्चार्ज आणि उपप्राचार्य श्री. अनंत कुलकर्णी आणि सायन्स विभाग प्रमुख सौ. मंजिरी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

सैनिकी परिवारातर्फे कॅम्पस डायरेक्टर सौ. गीतांजली बोधनकर, प्राचार्या सौ. सुवर्णा कांबळे, उपप्राचार्य श्री. अनंत कुलकर्णी, विज्ञान विभाग प्रमुख सौ. मंजिरी पाटील, पर्यवेक्षक श्री. संदीप पवार आणि श्री. श्याम नांगरे यांनी कॅडेट गीताला शुभेच्छा दिल्या.

कॅडेट गीता गणपत धनवडे हिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा … !!

म. ए. सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा, कासार आंबोली, पुणे

Shaurya Military Training, Adventure and Admission Camp – 2023 RLMSS….

Glimpses of –
Orientation to SSB Techniques, Medicals and a lot of field activities….
& Guest Lecture by Maj Smita Verma (Retd.)

On 4th May 2023, Cadet Geeta Ganpat Dhanavade, Std:- 9th (B) received the Achievement Kit from India Book of Records, and she became a Youngest Record Holder for her first innovation for an “Innovative Life-saver Whistle”.

She is very much thankful for School support and co-operation extended towards the subject activity …. !!!


ATL – Community Day 14 April – 2023 @ RLMSS

MES RLMSS ATL : Our Evolving Inclusive community outreach

ATL community day was celebrated in our school as per the call given by AIM Niti Aayog. This was celebrated on 13th April, 14th April and 15th April 2023.
On the first day of Celebration 13 April the interaction with community workers was organised in school.
The cadets interacted with sweepers, drainage cleaners, security guards, gardeners , electricians, plumbers, and washermen about their work profile and the problems faced during their work. One of the cadet Geeta dhanawade from standard 8 made a group and prepared and presented a gadget for disposal of the garbage which was one of the problems told by the sweepers like Used sanitary pads, stained dirty clothes, excreta of animals,etc
This interaction was an eye opener and created awareness about their responsibility to maintain a clean environment in their surroundings.
On the 2nd day of the program 14th April 2023 – the birth anniversary of Dr Babasaheb Ambedkar was celebrated with the children of community workers and teachers who reside in the school premises. Children enjoyed the program ‘fun with science projects’.

They were invited to see and learn the wonders of technology.They were given DIY kits, lago blocks and magnets and were asked to identify any problem and make solutions prototype models with it.
On 15th April around 25 students from Zilla Parishad schools of shindewadi and sutharwadi villages who were deprived and interested in learning new technology were invited. They were trained and mentored to get hands on experience like various activities such as “Do-it- yourself”, design thinking and introduction to 3D printing they were guided and mentored by school children of class 11 science stream.
The young inventors were built with ideas and made many designs using chart paper, LED bulbs and pencil cells.
It was interesting and opened a new horizon for them.
The educational and cultural bridges which have been * witness with our rural neighbours will be further enhanced in the time to come unity. This yearly event becomes a celebration of the spirit of unity in diversity.
‘Vasudhaiva kutumbakam’

A wonderful Passing Out Parade of RLMSS Pune in its all new and revised format…happened great here on 28 March 2023

‘Do so well – All the Best’ – for the Passing out March in Slow Time was performed and walked for the first time…

Shri Mitesh ji Ghatte, the RO & Chief Guest along with Sou. Dr. Madhavi ji Mehendale, Chairman SMC RLMSS graced the occasion and did the honors….vAh…

Great job by Ex Hav Shri Gajanan Mali – IC Mil Trg & Event Coord and Ex Hav Shri Balasaheb Chavan – Mil Inst & my Man Friday…

Felt so happy and immensely thankful..





https://www.youtube.com/live/Glnt6ovdzzU?feature=share

तरुणाईच्या सामर्थ्याचे दर्शन घडविणारा युवा चेतना दिन

लष्करी वेशात शिस्तबद्ध संचलन करत मान्यवरांना दिलेली मानवंदना, रिदम योगाद्वारे झालेले एकाग्रतेचे दर्शन, कराटे आणि अश्वारोहणातून दिसलेले धाडस, धनुर्विद्या आणि रायफल शूटिंगमुळे दिसून आलेली अचूकता, रोप मल्लखांबामुळे साधलेली लवचिकता, लेझमीच्या खेळातून साधलेली सांघिक भावना, मार्शल आर्टसच्या प्रशिक्षणातून झालेली स्वसंरक्षणाची तयारी बघून अचंबित झालेले प्रेक्षक असे दृश्य आज बघायला मिळाले, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ‘युवा चेतना दिना’च्या कार्यक्रमात. विद्या आणि बळाच्या आधारे आपण जग जिंकू शकतो, जगात वंदनीय ठरू शकतो हा संदेशच मएसोच्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या साहसी प्रात्यक्षिकांमधून या वेळी दिला आणि स्वामी विवेकानंदांना अभिप्रेत असलेला समर्थ भारत निर्माण करण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे हे दाखवून दिले.

स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे मएसो क्रीडावर्धिनीच्या माध्यमातून दरवर्षी ‘युवा चेतना दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने संस्थेच्या विविध शाखांमधले विद्यार्थी-विद्यार्थिनी विविध मैदानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करतात. यावर्षी मएसोच्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या प्रात्यक्षिकांनी सर्वांचीच मने जिंकली.

मएसो गरवारे महाविद्यालयाच्या मैदानावर आज (गुरुवार, दि. १२ जानेवारी २०२३) आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे मा. उपाध्यक्ष श्री. प्रदीपजी नाईक हे होते. आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू श्रीमती पूजा सहस्रबुद्धे-कोपरकर या प्रमुख अतिथी म्हणून तर समर्थ भारत संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. सुहास क्षीरसागर या वेळी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. संस्थेचे मा. उपाध्यक्ष डॉ. यशवंत वाघमारे, नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळाचे सदस्य आणि मएसो क्रीडावर्धिनीचे मा. अध्यक्ष श्री. विजय भालेराव, संस्थेचे साहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

कोरोना महामारीमुळे सर्व निर्बंधांचे पालन करून मर्यादित उपस्थितीत व बंदिस्त जागेत मैदानी प्रात्यक्षिकांशिवाय या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दोन वर्षांनंतर हा कार्यक्रम मैदानावर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रात्यक्षिकांसह अतिशय उत्साहात पार पडला.

प्रमुख वक्ते श्री. सुहास क्षीरसागर यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील विविध प्रसंग सांगत त्यांच्या कार्याची महती विशद केली. ते म्हणाले की, महापुरूषांचे आयुष्य दीपस्तंभासारखे असते. एखाद्या विचाराचा ध्यास घेणे म्हणजे काय हे स्वामी विवेकानंदांच्या जीवनातून शिकायला मिळते. भारतीय जीवन पद्धती ही वेदांतावर आधारित आहे हे त्यांनी जगाला सांगितले. त्याग हे भारतीय संस्कृतीचे व्यवच्छेदक लक्षण आहे, आपली संपत्ती इतरांना उपयोगी पडली तरच जीवनात सुख आणि शांतता लाभू शकते, स्वतःपेक्षा दुसऱ्या व्यक्तीचा, समाजाचा, देशाचा विचार करण्याची शिकवण भारतीय संस्कृती देते, हे स्वामीजींनी जगाला पटवून दिले. आपल्या देशातील जनता स्वत्व विसरली आहे, भारताची जगभर कुचेष्टा सुरू आहे, त्यामुळे आपल्या लोकांना जागृत करण्यासाठी स्वामीजींनी देशभर प्रवास केला. मन, बुद्धी आणि मनगट बळकट असेल तरच जग जिंकता येते हे त्यांनी समजावून सांगितले. आजच्या पिढीने देखील आपल्या क्षमता ओळखण्याची गरज आहे कारण तीच यशाची गुरुकिल्ली आहे.

श्रीमती पूजा सहस्रबुद्धे-कोपरकर विद्यार्थ्यांना मर्गदर्शन करताना म्हणाल्या की, जीवनात यशस्वी होण्यासाठी आपले कुटूंब, गुरूजन आणि शाळा-महाविद्यालय यांचा पाठिंबा असणे अनिवार्य असते. त्यांच्याच पाठिंब्यामुळे मला टेबल टेनिस खेळाच्या क्षेत्रात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवता आले. त्याचबरोबर खेळामुळे मला काही महत्वाचे गुण शिकायला मिळाले ते म्हणजे ध्येय निश्चिती, सांघिक भावना, कठोर परिश्रम आणि अपयश पचवण्याची क्षमता. त्यामुळे सातत्याने कठोर परिश्रम केले तर यश निश्चितच मिळते.

कार्यक्रमाच्या सुरवातीला आर्कि. राजीव सहस्रबुद्धे यांनी युवा चेतना दिनाच्या आयोजना मागील भूमिका विशद केली. तर श्री. विजय भालेराव यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला.

या वेळी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये लक्षणीय कामगिरी करणाऱ्या संस्थेच्या शाखांमधील विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या विद्यार्थ्यांचा परिचय प्रा. शैलेश आपटे यांनी करून दिला.

मएसो रेणुका स्वरुप प्रशालेतील शिक्षिका श्रीमती शिरीषा जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर इंजि. सुधीर गाडे यांनी आभार प्रदर्शन केले.

आनंद वार्ता

आपल्या सैनिकी शाळेतील कॅडेट गीता गणपत धनवडे, इयत्ता – आठवी (ब) आणि प्रोजेक्ट पार्टनर कॅडेट गिरीजा हेमंत जोगळेकर यांचा प्रोजेक्ट द इंजिनिअस टिंकरर्स (The ingenious Tinkerers Book – Top innovations of ATL Marathon – भारतातील सर्वोच्च कुशल 22 प्रोजेक्ट्स) या नीती आयोग (NITI Aayog, Government of India) आणि अटल इनोवेशन मिशन (Atal Innovation Mission, Government of India) भारत सरकार यांच्या सन 2020-21 या पुस्तकांमध्ये प्रकाशित झाला आहे.

Online website link :-

(Printed Page No.- 91, 92, 93 and 94)

कोविड-19 पेंडॅमिक् (कोविड महामारी) मध्ये फ्रंट लाईन कोरोना वॉरियर्स पोलिसांचे कोरोना पासून संरक्षण करण्यासाठी शिट्टीला सुरक्षा कवच बनविले.
प्रोजेक्टचे नाव :- Police whistle with safety enclosure protection from COVID-19 pandemic.

प्रोजेक्टचा यशस्वी प्रवास :-
1) संपूर्ण भारतातून “Top 300 Projects” मध्ये निवड झाली.
2) महाराष्ट्र राज्यातून “Top 10 Projects” मध्ये निवड झाली.
3) संपूर्ण भारतातून “Top 30 Projects” मध्ये निवड झाली.
4) संपूर्ण भारतातून मुलींच्या ग्रुप मधून “Top 10 Projects” मध्ये निवड झाली.
5) NITI Aayog भारत सरकार तर्फे 300 प्रोजेक्ट्सचे मॉडेल्स बनविण्यात आले.
6) भारत सरकार तर्फे प्रोजेक्ट पेटेंटींग साठी प्रस्ताव सादर.
7) पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त मा. श्री. कृष्णप्रकाश सर यांच्यातर्फे कौतुक आणि सत्कार करण्यात आला.

सदरील प्रोजेक्ट राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेच्या अटल टिंकरिंग लॅब मध्ये अनंत कुलकर्णी सर आणि मंजिरी पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली बनविण्यात आला. माजी प्राचार्या सुलभा विधाते मॅडम यांनी प्रोजेक्ट बनवण्यासाठी प्रोत्साहन दिले.

संपूर्ण सैनिकी परिवारातर्फे गीता आणि गिरजाचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि पुढील कार्यास शुभेच्छा … !!!

It was in 2019 ,I along with ira and Aditya, my kids, went to witness(RD) Republican Day parade at New Delhi. It was the month of January.. and the frosty early morning and shivering chilli wind shattered us completely. it was 5 degree temperature outside and we were sitting at one place, for nearly 5 hours, at Rajpath.Battalions and the platoons of Indian Army, Navy,and Air Force lit the patriotic feeling in us.exchange of the Salutes, the Airshow of MIG and Mirage.. thrilled the entire atmosphere and the every state demonstrated their cultural heritage….
The patriotic songs and the divine atmosphere made us spellbound..

Ira, my daughter was completely mesmerize.. by this event. Immediately, after returning home,she decided to join an Army school and started searching for military schools in every corner of the state., where she can be admitted..And she found Rani Lakshmi Bai mulinchi sainiki Shala. at pune.

she enrolled her name. she cleared her entrance, Viva, medical test,and finally in standard 8, she was enrolled for Military School. since then, down the line, 3 years she is in this Army School and I am proud parent of Rani Lakshmi Bai mulinchi sainiki Shala.

In these many years, I can surely state that, I notice wonderful and miraculous changes in my daughter.. When she was admitted, she was 65 kgs and now she is 50 kgs. So, she lost 15 kgs in this 3 years. Secondly, Army schools made her independence, bold, confident…

Proudly noticeable achievement:

Nearly 600 + cadets study in this Army School. Along with Academics they are imparted with the training of horse riding, Karate, swimming, archery, खो-खो, Kabaddi,football, basketball and other team games as well as individual games. These cadets are groomed in such a beautiful way, that not only they are good in the Academics, but they are also good in physical fitness, endurance, and stamina..

Not only the cadet, but also the parents have to follow some rules and regulations of the school. The first and the foremost rule is
1. Not to contact the kids.

2. Not to supply any food stuff.

3. keep healthy atmosphere in the school.

and… I think after 3 years I can surely say that the patience and the perseverance of the parents bore fruits. parents are happy to see a drastic change in their kids.

So, now, my question is why not military schools? are coming up like mushrooms? everywhere?? in the corner of the country ??

Let me remind you…
This is not today’s traditions, it was mandatory, since our Vedic time.. when Brahmacharya ashram, Grihasthashram Vanaprastha ashram and Sanyas Ashram where compulsory for every individual. A life span was considered to be of 100 years ..and after every 25 years there was a change…
so, once the thread ceremony was conducted ,each and every child was suppose to go to his Guru, to take the Guru Vidya and to live there with his Guru..till he or she complete the education.

There he or she, used to learn the skills of archery, horse riding, Vedas, upanishads,..

and …exactly same, we are practicing today in military school. Then why there are no such kind of schools? in large scale? why are parents reluctant to send their kids to military schools ?
Such kind of school must be mandatory and compulsory in each and every City.

The most important change which I notice is 600 + cadets are away from internet, laptop, cell phones, and social media.., which is one of the most important achievement of any school of this time…

When the world was stamp down, by the attack of Corona, RLMSS cadets of military school, were exclusively doing well in all the fields.

some kids are exclusively good at singing some are good at drawing.. some are good in military training..some do wonderful fitness..
so, they are able to showcase their on Why not military schools???

It was in 2019, I along with ira and Aditya, my kids, went to witness(RD) Republican Day parade at New Delhi. It was the month of January.. and the frosty early morning and shivering chilli wind shattered us completely. it was 5 degree temperature outside and we were sitting at one place, for nearly 5 hours, at Rajpath. Battalions and the platoons of Indian Army, Navy and Air Force lit the patriotic feeling in us. exchange of the Salutes, the Airshow of MIG and Mirage.. thrilled the entire atmosphere and the every state demonstrated their cultural heritage….
The patriotic songs and the divine atmosphere made us spellbound..

Ira, my daughter was completely mesmerize.. by this event. Immediately, after returning home, she decided to join an Army school and started searching for military schools in every corner of the state., where she can be admitted..And she found Rani Lakshmi Bai mulinchi sainiki Shala. at pune.

she enrolled her name. she cleared her entrance, Viva, medical test and finally in standard 8, she was enrolled for Military School. since then, down the line, 3 years she is in this Army School and I am proud parent of Rani Lakshmi Bai mulinchi sainiki Shala.

In these many years, I can surely state that, I notice wonderful and miraculous changes in my daughter.. When she was admitted, she was 65 kgs and now she is 50 kgs. So, she lost 15 kgs in this 3 years. Secondly, Army schools made her independence, bold, confident…

Proudly noticeable achievement:

Nearly 600 + cadets study in this Army School. Along with Academics they are imparted with the training of horse riding, Karate, swimming, archery, खो-खो, Kabaddi,football, basketball and other team games as well as individual games. These cadets are groomed in such a beautiful way, that not only they are good in the Academics, but they are also good in physical fitness, endurance, and stamina..

Not only the cadet, but also the parents have to follow some rules and regulations of the school. The first and the foremost rule is
1. Not to contact the kids.

2. Not to supply any food stuff.

3. keep healthy atmosphere in the school.

and… I think after 3 years I can surely say that the patience and the perseverance of the parents bore fruits. parents are happy to see a drastic change in their kids.

So, now, my question is why not military schools? are coming up like mushrooms? everywhere?? in the corner of the country ??

Let me remind you…
This is not today’s traditions, it was mandatory, since our Vedic time.. when Brahmacharya ashram, Grihasthashram, Vanaprastha ashram and Sanyas Ashram where compulsory for every individual. A life span was considered to be of 100 years ..and after every 25 years there was a change…
so, once the thread ceremony was conducted, each and every child was suppose to go to his Guru, to take the Guru Vidya and to live there with his Guru..till he or she complete the education.

There he or she, used to learn the skills of archery, horse riding, Vedas, upanishads,..

and …exactly same, we are practicing today in military school. Then why there are no such kind of schools? in large scale? why are parents reluctant to send their kids to military schools?
Such kind of school must be mandatory and compulsory in each and every City.

The most important change which I notice is 600 + cadets are away from internet, laptop, cell phones, and social media.., which is one of the most important achievement of any school of this time…

When the world was stamp down, by the attack of Corona, RLMSS cadets of military school, were exclusively doing well in all the fields.

some kids are exclusively good at singing some are good at drawing.. some are good in military training.. some do wonderful fitness..
so, they are able to showcase their on talent and own ability..
cadet is not spoon fed here. He or she has to start from the scratch and those sincere efforts, makes her or him more strong.

I think that, the mindset of the parents should be changed now..
More and more parents must send their kids to such military schools, where along with,
Academics, physical training is also mandatory…, which will make their kids strong -mentally, physically, emotionally! and they will be able to sustain and leave a better life ahead.. and Next Generation will be kind hearted individuals, obedient citizens and hardcore patriots….

By
Aarti khadilkar

A world of science’ revealed through experiments at MES Rani Lakshmibai Mulinchi Sainiki School

Kasar Amboli, 14 October 2022.

A ball floating in the air without any support, and watching the collision of the same ball with another ball next to each other, were some of the experiments amazed the audience present in the multipurpose hall of the school. Bernali’s principle of air velocity, the reflection of light in different mediums through the thyroscope and the law of momentum conservation when the oscillating Newton’s cradle collides with each other, Electromagnetic induction by means of Various concepts such as magnetic attraction were explained to the children through interesting experiments.
‘Atal Tinkering’ laboratory of M. E. S Rani Lakshmibai Mulinchi Sainiki Shala had organized a workshop on ‘The Joy Learning Science Through Experiments’ before the ‘Science Vachan Prerna Divas’.
Along with 378 girls cadets from Sainiki school, more than 150 students from various schools like Vidya Bhavan English Medium School, Sanskar School, Heritage International School, Elite International School and Sudarshan Vidyamandir participated in the workshop. Former Professor Shri. Bhagwan Chakradev who dedicated his life for the science exploration was the main guide and Mr. Keshavrao Deshpande along with Mr. Vijay Patil assisted him in the experiments.
Through this programme, the complex concepts of science were presented to the students in a very interesting manner and connected with their daily life. Sainiki School implemented an innovative concept of ‘Science Vachan Prerna Divas’ on Saturday 15th October by reading the various concepts presented in the programme. Sainiki School always organizes such programmes for the overall development of the rural students in its surrounding areas. On this occasion, the Sainiki School intends to bring all these schools together using the concept of ‘Cluster School’.
Mr. Ravindra Chaudhary, Cluster Head of Urawade Cluster , Mrs. Suvarna Kamble, Principal of Sainiki School, Commandant Mr. M. Yagyaraman were present for this programme. The programme was organized by ATL Head of the Department Mr. Anant Kulkarni and Head of Science Department Mrs. Manjiri Patil under the mentorship of Campus Director Mrs. Geetanjali Bodhankar . Mr. Anant Kulkarni, Vice Principal of the school thanked everyone and concluded the programme.

विजयादशमी संचलन ……. @ कासार अंबोली by RLMSS

Air Force Day Celebration

90th Indian Air Force Day was celebrated by Air wing NCC cadets of Rani Laxmibai Mulinchi Sainiki Shala, Pune on 8th October 2022. Air Force Day special parade was done by NCC squadron at 6:00 am on school ground. Then at 8:00 am school assembly was conducted by NCC cadets in the multi purpose hall. Then at 9:00 am the ‘Live parade and Fly past’ from Air Force Station, Chandigarh was shown to all school cadets. All program was conducted by Air wing NCC cadets.

शारदीय नवरात्रौत्सवाने आपणा सर्वांच्या जीवनात एकप्रकारचा आनंदोत्सव ओसांडून वाहतो असतो. या निमित्ताने, मएसो राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा कासारअंबोली, येथे सोमवार दि.०३ ॲाक्टोबर २०२२ रोजी दु.३.०० ते ५.०० या वेळात सामाजिक भोंडला प्रशालेत आयोजित करण्यात आला. कौटुंबिक स्नेहमेळावा, मैदानावर गरबा, भेटीगाठी व चहापान असे या कार्यक्रमाचे स्वरुप होते. बऱ्याच मैत्रिणींच्या या कार्यक्रमामुळे भेटीगाठी झाल्यात.

मुळशी तालुका विज्ञान प्रदर्शन (2021 – 22)

सोमवार दि.12 सप्टेंबर रोजी मुळशी तालुका विज्ञान प्रदर्शन ऑनलाइन स्वरूपात संपन्न झाले.

या प्रदर्शनात प्रशालेतील इ. 8 ब ची विद्यार्थिनी कु. गीता गणपत धनवडे व इ. 10 ब ची विद्यार्थिनी कु. भार्गवी आनंद शिंदे यांनी सहभाग नोंदवला.

लहान गट इ. ६ वी ते ८ वी – कु. गीता गणपत धनवडे – प्रथम क्रमांक
प्रकल्प – Smart and low cost drainage waste collector

मोठा गट – कु. भार्गवी आनंद शिंदे – प्रथम क्रमांक
प्रकल्प – Portable solar cabin

दोन्हीही प्रकल्पांची निवड जिल्हास्तरावर करण्यात आली.

जिल्हास्तरीय प्रदर्शनात कु. गीता धनवडे या विद्यार्थिनीच्या प्रकल्पाची निवड राज्यस्तरासाठी करण्यात आली आहे.

गुरुवार, दिनांक ११ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा, कासार आंबोली ता. मुळशी, जि. पुणे,
संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना ‘हर घर झेंडा’ या उपक्रमांतर्गत कासार आंबोली गावामध्ये ग्रामपंचायतचे सर्व सदस्य सरपंच उपसरपंच यांसमवेत प्रभात फेरी काढून जनजागृतीपर पत्रके वाटून आणि घोषणा देत प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थिनींच्या घोष पथकाने लोकांना जागृत करण्यासाठी वातावरण निर्मिती केली आणि विद्यार्थिनिंनी घोषणा देत परिसर दणाणून सोडला…
हातात घेतलेले फलक लोकं उत्साहाने वाचत होते आणि उपक्रमाविषयी माहिती घेत होते.
प्रभात फेरीची सुरुवात प्रशालेच्या परिसरातून सुरू होऊन ग्रामपंचायत कासार आंबोली गावाच्या प्रांगणात सांगता झाली.
सदर कार्यक्रमास गावाचे सरपंच कुमार रणजित गायकवाड, उपसरपंच स्वप्नील कांबळे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, उपस्थित होते.
तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुवर्णा कांबळे, उपमुख्याध्यापक अनंत कुलकर्णी प्रशालेचे जेष्ठ शिक्षक अद्वैत जगधने, सुनीता शिंदे, भाऊसाहेब मार्तंड, रविराज थोरात, महादेव मगर तसेच प्रशालेतील हॉस्टेल विभागाच्या प्रियंका गुरव, शितल मार्तंड आणि प्रशालेचे सेवक पोपट कणगरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

मएसो राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेतर्फे
क्रांतीदिनी हुतात्म्यांना मानवंदना

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळेतर्फे क्रांतीदिनानिमित्त आज (मंगळवार, दि. ९ ऑगस्ट २०२२) सकाळी हुतात्मा चौकातील हुतात्मा भास्कर पांडुरंग कर्णिक यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यात आले. शाळेतील विद्यार्थिनींनी सैनिकी वेशात हुतात्म्यांना मानवंदना दिली. इतिहास अभ्यासक मोहन शेटे यांनी यावेळी हुतात्मा कर्णिक यांच्या कार्याची सविस्तर माहिती उपस्थितांना करून दिली.

या वेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष आर्कि. राजीव सहस्रबुद्धे, नियामक मंडळाचे सदस्य मा. प्रल्हाद राठी, सैनिकी शाळेच्या महामात्रा डॉ. मानसी भाटे आणि सौ. चित्रा नगरकर, संस्थेचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुवर्णा कांबळे, कमांडंट विंग कमांडर यज्ञरमण आदी मान्यवरांनी हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र आणि पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली.

या प्रसंगी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दि. १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत देशभर राबविण्यात येणाऱ्या ‘हर घर तिरंगा’ अभियानाला अनुलक्षून संस्थेने तयार केलेल्या पत्रकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

सैनिकी शाळेतील विद्यार्थिनींच्या मानवंदनेने वातावरण भारावून गेले होते. वर्दळीच्या ठिकाणी आणि कामाच्या गडबडीत असतानादेखील अनेक नागरिक उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमाला उपस्थित होते.

इतिहास अभ्यासक मोहन शेटे यावेळी बोलताना म्हणाले, “देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्मा भास्कर कर्णिक यांच्यासारख्या असंख्य क्रांतिकारकांप्रती आजच्या क्रांतीदिनी कृतज्ञता व्यक्त करतानाच या स्वराज्याचे सुराज्यात परिवर्तन करण्याची प्रतिज्ञा करू या! देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनात निकराचा संघर्ष करण्यासाठी महात्मा गांधीजींनी १९४२ साली मुंबईत गवालिया टँक येथील सभेत ब्रिटिशांविरोधात ‘चले जाव’ची घोषणा केली आणि “करेंगे या मरेंगे” चा नारा दिला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी विविध मार्गांनी आंदोलने केल्यानंतर आता जुलमी ब्रिटिश साम्राज्य हादरवून टाकण्यासाठी जोरदार धमाका केला पाहिजे या भावनेतून भास्कर पांडुरंग कर्णिक आणि त्यांच्या साथीदारांनी पुण्यातील कँप परिसरात असलेल्या कॅपिटॉल आणि वेस्ट एन्ड या दोन चित्रपटगृहात दि. २४ जानेवारी १९४३ रोजी चित्रपटाचा खेळ चालू असताना रात्री ९.३० वाजता भास्कर पांडुरंग कर्णिक आणि त्यांच्या पाच साथीदारांनी ६ बॉम्बस्फोट घडवून आणले. त्यात ३ ब्रिटिश अधिकारी ठार झाले तर १८ जण जखमी झाले. या घटनेने ब्रिटिश सरकारला मोठा हादरा बसला. स्फोटासाठी वापरलेले बॉम्ब देहूरोड येथील दारुगोळा कारखान्यात तयार झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आणि पोलीसांनी भास्कर कर्णिक व त्यांच्या काही साथीदारांना अटक करून फरासखाना पोलीस ठाण्यात आणले गेले. त्यावेळी लघुशंकेचे निमित्त करून भास्कर कर्णिक बाजूला गेले आणि तेथे खिशातली सायनाईडची पूड खाऊन आत्मार्पण केले, तो दिवस होता ३१ जानेवारी १९४३. अशाप्रकारे कॅपिटॉल बॉम्ब खटल्यातील मुख्य दुवा नाहीसा झाल्यामुळे इतर क्रांतिकारकांची नावे पोलीसांना समजू शकली नाहीत. हुतात्मा भास्कर कर्णिक यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली पण देशाशी प्रतारणा केली नाही.”

संस्थेचे सहाय्यक सचिव इंजि. सुधीर गाडे यांनी कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रास्ताविकात स्वातंत्र्यपूर्वकाळात स्थापन झालेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कार्याची महती विशद केली.

शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुवर्णा कांबळे यांनी आभारप्रदर्शन केले.

Scroll to Top
Skip to content